HomeArchiveओकिनावाद्वारे १०००हून अधिक...

ओकिनावाद्वारे १०००हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आर्थिक व्यवहारांसदर्भात सरकारने शिथिलता आणल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ब्रँड कार्यसंचालनापासून महिनाभरात १०००हून अधिक स्कूटर्सची विक्री केल्याची घोषणा केली आहे. या ब्रँडने भारतभरातील ३५० हून अधिक डिलर्सपैकी ६० ते ७० टक्‍के कार्यरत टचपॉईंट्सच्या माध्यमातून हा विक्री आकडा संपादित केला. कंपनीने कोविड-१९ प्रतिबंधासाठी २५ टक्‍के कर्मचारीवर्ग आणि सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ११ मे २०२० रोजी अंशत: कार्यसंचालनांना सुरूवात केली. ओकिनावाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरच्या १ महिन्याच्या कार्यसंचालनामध्ये १२००हून अधिक वाहने पाठवली आहेत.
 
“हा ब्रँड त्यांच्या भागधारकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व आवश्‍यक खबरदारीचे उपाय घेत आला आहे. उत्पादन युनिटमधील असेम्बलीमधून पाठवण्यापूर्वी सर्व उत्पादने सॅनिटाईझ केली जातात आणि डिलरशिप्समध्ये डिलर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईझ करतात. ओकिनावा आर्थिक वर्ष २०२०मधील भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे आणि भारतामध्ये १०,०००चा टप्पा पार करणारी एकमेव ईव्‍ही कंपनी आहे.”
 

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content