Homeहेल्थ इज वेल्थव्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे...

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल, रोडपाली रोड, कळंबोली, नवी मुंबई येथे हे शिबीर होईल. मधुमेह आणि लठ्ठपणा नजरेसमोर ठेवून या तपासण्या केल्या जाणार आहेत.

या शिबिरात रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक तथा ख्यातनाम क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा, डॉ. प्रशांत गायकवाड (एन्डोक्राइनॉलॉजी डायबेटोलॉजी), डॉ. रवी पाटील (इंटरनल मेडिसीन), डॉ. आदित्य नायक (नेफ्रोलॉजी), डॉ. सचिन नाईक (नेफ्रोलॉजी), डॉ. सुहास देशपांडे (नेत्ररोगतज्ज्ञ) यांच्या देखरेखीखाली या तपासण्या होऊन रूग्णांना मोफत वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. फायब्रो स्कॅन, लिपिड प्रोफाईल, एचबीएवनसी (HbA1c), क्रिएटिनीन आणि डोळ्यांची तपासणी, अशा पाच हजार रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या तपसण्या मोफत केल्या जाणार आहेत.

इच्छुकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी लगेचच ८८७९३०७९३० किंवा १८००३१३८९९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विजय डिसिल्वा यांनी केले आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content