Homeमुंबई स्पेशलउद्या लोअर परळ,...

उद्या लोअर परळ, प्रभादेवी भागात पाणीपुरवठा विस्कळीत

तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्‍ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

१. जी दक्षिण- करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

२. जी दक्षिण– एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी २.३० ते दुपारी ३.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

३. जी दक्षिण– संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

४. जी उत्तर– सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content