Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फ कायदा सुधारणा...

वक्फ कायदा सुधारणा विधेयक आजच लोकसभेत!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे विधेयक आज लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्यास विरोधी पक्षांचा विरोध आहे. हे लक्षात घेता यावेळी प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे.

शेख हसीना सध्यातरी भारतातच

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या काही काळ तरी भारताचा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी प्रचंड जनक्षोभानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडले होते त्यानंतर त्यांनी भारतात तात्पुरता आशय घेतला आहे सध्या त्या गाजियाबाद मधल्या हिंडन एअर बेस मध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहेत त्या त्यांना अमेरिकेने विजा नाकारला आहे तर इंग्लंडने ही त्यांच्या प्रदेशाला मान्यता दिलेली नाही त्यामुळे ते युनायटेड अरब अमिरात किंवा फिनलँड मध्ये आश्रय घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे.

विनेश फोगटचा कुस्तीला रामराम 

विनेश फोगटने कुस्तीला रामराम करत कुस्तीतून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. एक्सवर ट्विट करत तिने ही घोषणा केली. आईला उद्देश्यून केलेल्या ट्विटमध्ये तिने कुस्ती जिंकली, मी हरले.. असे म्हटले आहे. दरम्यान, पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात फायनलमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय लवादाकडे अपील करत आपल्याला संयुक्तपणे रौप्यपजक द्यावे, अशी मागणी केली आहे.

भारताच्या पदरी निराशा

दरम्यान, भारताच्या पदरी काल रात्री आणखी दोन ठिकाणी निराशा झाली. वेटलिफ्टर मीराबाई चानू अखेरच्या क्षणी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे तिला पदक मिळण्याची शक्यता मावळली. स्टीपलचेसमध्ये पदकाची आशा निर्माण करणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे ११व्या स्थानावर आला. त्यामुळे तेथेही क्रीडाप्रेमींची निराशा झाली. आज संध्याकाळी भारताचा पुरूष हॉकी संघ कांस्यपदकाकरीता स्पेनबरोबर लढत देणार आहे. त्याचबरोबर भालाफेकमध्ये सध्या अव्वलस्थानी असलेला नीरज चोप्राकडूनही भारताला पदकाच्या आशा आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content