Homeटॉप स्टोरीउपराष्ट्रपती धनखड यांचे...

उपराष्ट्रपती धनखड यांचे राहुल गांधींना खडे बोल!

घटनात्मक पदावरील व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन राज्यघटनेच्या शपथेचा अवमान करते, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या संस्थांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवते, तेव्हा जग आपल्यावर हसते, असा टोला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

राजस्थानच्या अजमेरमधल्या केंद्रीय विद्यापीठात काल एका मेळाव्याला संबोधित करताना धनखड बोलत होते. आपल्या राष्ट्रासाठी योग्य आचरणाला साजेसे नसलेल्या, आपल्या राष्ट्रवादाला चालना न देणाऱ्या कृती करण्याची आपण कल्पनादेखील करू शकतो का? आपल्या विरोधकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करण्यापेक्षा राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर देण्याची गरज आहे. देशहिताविरोधात काम करणाऱ्यांना इतिहासाने कधीही माफ केले नाही, असेही ते म्हणाले.

राहुल

राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात भारताची प्रतीमा मलिन होईल, अशा स्वरूपाचे भाष्य केले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. याचा पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी केलेल्या भाष्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊनही काही लोक देशाला त्रास देत आहेत आणि राष्ट्रवादाशी तडजोड करत आहेत. हे घृणास्पद, निंदनीय, दोषास्पद देशविरोधी वर्तन आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या शत्रूंच्या स्वार्थाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असेही धनखड म्हणाले.

देशाच्या सीमेपलीकडे पाऊल टाकणारा प्रत्येक भारतीय हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्रवादाचा राजदूत असतो. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते असलेले वाजपेयी यांनी जागतिक व्यासपीठावर संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताच्या हिताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले होते. या पदावरील माझे कर्तव्य राजकारण करणे हे नाही. राजकीय पक्षांनी त्यांची स्वतःची कामे करावीत. विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन भिन्न असतील आणि शासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असेल. पण एक गोष्ट कायम राहिली पाहिजे की राष्ट्र सर्वोच्च आहे. आम्ही राष्ट्रीय भावना दाबू शकत नाही. जेव्हा देशासमोर आव्हाने येतात तेव्हा आपण एकजुटीने उभे असतो. आपला रंग, धर्म, जात, संस्कृती किंवा शिक्षण काहीही असले तरी आपली एकजूट आहे आणि आपण एक आहोत, असे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content