Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या लसीकरणाची उद्याची...

मुंबईतल्या लसीकरणाची उद्याची माहिती आज संध्याकाळी!

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवसाच्या लसीकरणासंबंधीची माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेच्या समाज माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे.

देशभरात १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. लससाठ्याच्या उपलब्धतेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आणि तेथे नियोजित सत्रांची माहिती प्रसारमाध्यमांसह मुंबई महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यम स्थळांवरून दररोज सायंकाळी प्रकाशित केली जाते. यामध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांचा समावेश आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना अंमलबजावणीत सुसूत्रता आणता यावी यासाठी आता सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांची कामकाजाच्या दिवशी (म्हणजेच रविवार / लससाठा नसल्यास लसीकरण बंद असल्याचे दिवस वगळून) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमणे दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित करण्यात येईल. उपलब्ध लससाठ्यानुसार ही वेळ असेल. निश्चित केलेल्या वेळेत काही बदल होणार असेल तर त्याची आगाऊ माहिती प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content