Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या लसीकरणाची उद्याची...

मुंबईतल्या लसीकरणाची उद्याची माहिती आज संध्याकाळी!

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवसाच्या लसीकरणासंबंधीची माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेच्या समाज माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे.

देशभरात १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. लससाठ्याच्या उपलब्धतेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आणि तेथे नियोजित सत्रांची माहिती प्रसारमाध्यमांसह मुंबई महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यम स्थळांवरून दररोज सायंकाळी प्रकाशित केली जाते. यामध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांचा समावेश आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना अंमलबजावणीत सुसूत्रता आणता यावी यासाठी आता सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांची कामकाजाच्या दिवशी (म्हणजेच रविवार / लससाठा नसल्यास लसीकरण बंद असल्याचे दिवस वगळून) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमणे दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित करण्यात येईल. उपलब्ध लससाठ्यानुसार ही वेळ असेल. निश्चित केलेल्या वेळेत काही बदल होणार असेल तर त्याची आगाऊ माहिती प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content