Homeपब्लिक फिगर७ वर्षांनंतर होणार...

७ वर्षांनंतर होणार एसआरएतल्या घराचे हस्तांतरण!

राज्यातल्या एसआरए योजनेमधील सदनिका हस्तांतरण कालावधी दहा वर्षांवरून सात वर्षे करण्याचा तसेच नातेवाईकांच्या हस्तांतरणासाठी असलेली स्टॅम्प ड्युटी एक लाख रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली.

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरएचे सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर सभागृहात ते बोलत होते. राज्यातल्या रखडलेल्या एसआरए योजना मार्गस्थ लावण्यासाठी म्हाडा किंवा एसआरए किंवा एमएमआरडीए यांच्याबरोबर जॉईंट वेंचर करण्यासही अनुमती देण्यात येणार आहे. अभय योजनेअंतर्गत रिझर्व बँकेची मान्यता असलेल्या वित्तीय  संस्थांचे अडकलेले पैसे परत करण्यापासून नवीन कर्ज उपलब्ध करून एसआरएच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव त्याचे अध्यक्ष असतील, असेही त्यांनी सांगितले.

एसआरए

मागच्या सरकारने रद्द केले 517 योजना पुन्हा सुरू करण्यासाठी जलद गतीने सुनावणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी ए, बी, सी, अशा तीन स्वरूपामध्ये विकासकांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. यात अनुक्रमे १५, ९ आणि सहा विकासकांचा समावेश आहे. याकरीता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहिली गेली आहे. निविदा प्रक्रियेद्वारे त्यांना या रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी देण्यात येतील. या 517 योजनांपैकी 300 योजना निविदा प्रक्रियेद्वारे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एसआरए योजनेतील घर अडीच लाख रुपयांना देण्यात येईल. जवळच्या नातेवाईकांच्या नावावर घर करण्यासाठी दोनशे रुपये आकारण्यात येतील. पन्नास हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेऊन त्याचे हस्तांतरण होईल. खाजगी जमिनीवर असलेल्या जुन्या चाळीतील पहिल्या माळ्यावर राहत असलेल्या लोकांनाही पुनर्विकासात पुनर्वसनाचा लाभ देण्यात येईल. विविध 17 प्रकारच्या परवानग्या एकाच खिडकीवर देण्याची योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच ती सुरू केली जाईल. त्याचप्रमाणे एनक्शेअर टू डिजिटली तयार केले जाईल. त्यामुळे ते वेबसाईटवरही पाहता येईल आणि यामध्ये होणारे गैरप्रकार टाळता येतील. त्याचप्रमाणे ई केवायसी घेऊन ते आधार कार्डाशी जोडण्यात येतील. परिणामी एका लाभार्थ्याला दोन-दोन, तीन-तीन योजनांमधून लाभ घेता येणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content