Homeबॅक पेजमोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी...

मोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी ट्राय कोणाशीही संवाद साधत नाही!

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय, मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपात मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाही. ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला या कामासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे ट्रायकडून असल्याचा दावा करणारे कोणत्याही प्रकारचे संवाद (कॉल, मेसेज अथवा नोटीस) अथवा मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याची धमकी, हा संभाव्य फसवणुकीचा प्रयत्न मानला जावा आणि त्याची दखल घेऊ नये, असे आवाहन ट्रायने केले आहे.

ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अधिकारी असल्याचे भासवून दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे लक्ष्य केले जात असून, बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल अथवा पैसे उकळण्यासाठी मोबाईल कनेक्शन (जोडणी) तोडण्याची धमकी दिली जाते. बिलिंग, केवायसी अथवा गैरवापर झाल्याप्रकरणी एखाद्या मोबाईल क्रमांकाचे कनेक्शन तोडण्याचे काम संबंधित टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी), अर्थात दूरसंचार सेवा प्रदाता करतो. नागरिकांनी सतर्क राहवे आणि संभाव्य फसवणुकीला बळी पडून घाबरून जाऊ नये, असे आवाहनही ट्रायने केले आहे.

संबंधित टीएसपीचे अधिकृत कॉल सेंटर अथवा ग्राहक सेवा केंद्रांशी संपर्क साधून अशा कॉल्सची पडताळणी करावी. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. या व्यासपीठावर प्रवेश करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे: https://sancharsaathi.gov.in/sfc/. सायबर गुन्हा झाल्याची खात्री पटल्यावर पीडितांनी ‘1930’ या निर्धारित सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांकावर अथवा https://cybercrime.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असेही ट्रायने म्हटले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content