Homeमुंबई स्पेशलकाळा घोडा महोत्सवातल्या...

काळा घोडा महोत्सवातल्या पर्यटकांना पालिका बचतगटांच्या उत्पादनांची भुरळ

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला विशेषत्वाने ओळखले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदा शनिवारी २५ जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, २ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातल्या कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत.

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचतगटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचतगटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठीदेखील पालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून काळा घोडा महोत्सवातही पालिकेने या बचतगटांसाठी दालने उपलब्ध करून दिली आहेत. या महोत्सवात १८ बचतगट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचतगटांचा समावेश आहे. कापडव्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचतगटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी दालने उभारली आहेत.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content