Friday, May 2, 2025
Homeपब्लिक फिगरआज भारतातले ठेवीदार...

आज भारतातले ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत!

भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशावर दोनशे पस्तीस लाख कोटी रुपये कर्ज असून पाच ट्रिलियन डॉलरचे मृगजळ दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात देशाची आर्थिक परिस्थिती अतीशय भयानक आहे. देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत नमूद केले.

तीन दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेची सांगता अर्थतज्ज्ञ उटगी यांच्या ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे का?’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. सुमारे दोन तास त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांतील अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे चढउतार समजावून सांगताना सहकारी बँका केंद्र सरकारने तसेच रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयांमुळे कशा डबघाईस आल्या, कशा बुडाल्या, संचालक मंडळ दोषी धरण्यात आले, परंतु रिझर्व्ह बँक अधिकारी कसे बेमालूम सटकले, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारख्यांनी अर्थव्यवस्थेला कसा चुना लावला आणि सामान्य, मध्यमवर्गीय कसा नाडला जातोय, ही संपूर्ण परिस्थिती सांगितली.

पक्ष कोणताही सत्तेवर येवो, मग तो कॉंग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष या परिस्थितीला जबाबदार आहे. राजकारण महत्त्वाचे नाही, अर्थकारण महत्त्वाचे आहे. हे अर्थकारण बिघडले तर पाच ट्रिलियन डॉलरची घोषणा निव्वळ घोषणाच राहते. मध्यमवर्गीय माणसाला बसायचा तो फटका बसतोच. दहा टक्के मूठभर लोकांच्या भल्यासाठी एकशे चाळीस कोटी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण न्यायालयात जाऊन अनेक प्रकरणी लोकांना न्याय मिळवून दिला असल्याचा दावासुद्धा विश्वास उटगी यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेची ३१ वर्षांची यशस्वी वाटचाल

क्रीडाविश्वात बऱ्याचदा विविध खेळांच्या नवनव्या स्पर्धांचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सुरुवातीला या स्पर्धांबाबत आयोजकांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे काही काळ या स्पर्धा सुरू राहतात. नंतर मात्र आयोजकांचा उत्साह कमी झाल्यानंतर अनेक स्पर्धा बंद पडल्याची बरीच...

महाराष्ट्राच्या जिल्हा युवा पुरस्कारने सानिया खान सन्मानित

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचा २०२३-२४चा जिल्हा युवा पुरस्कार (युवतीकरिता) सानिया मोहम्मद आरिफ खान हिला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल महाराष्ट्रदिनी प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये असे या...

यंदाच्या उन्हाळ्यात बेघर, कामगारांना उष्माघाताचा धोका!

यंदाच्या उन्हाळ्यात निवाऱ्याच्या आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, उघड्या जागेत काम करणारे श्रमिक, वृद्ध, लहान मुले आणि विशेषत: बेघर लोकांना उष्णतेच्या लाटेचा धोका असून त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रासह 11 राज्यांना केले आहे. उन्हाळ्यात,...
Skip to content