Homeमुंबई स्पेशलयंदाही २० जुलैलाच...

यंदाही २० जुलैलाच वाहू लागला तुळशी तलाव!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा मुंबईतलाच पालिकेचा तुळशी तलाव आज, २० जुलैला सकाळी ८.३० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षीदेखील २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.

८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारणक्षमता असणारा हा तलाव २०२२ व २०२१मध्ये १६ जुलैलाच ओसंडून वाहू लागला होता. त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच २०२०मध्‍ये २७ जुलैला तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८७९मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे १.३५ चौरस किलोमीटर असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) असतो. तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

Continue reading

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात उभा राहतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...
Skip to content