९ आणि १३ ऑक्टोबरला गोरेगाव-कांदिवली परिसरात पाणी नाही!

मुंबईतल्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलण्याच्या कामासाठी सोमवार, दिनांक ९ आणि शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा जुन्या व खराब झाल्यामुळे (एकूण १० जलद्वार) बदलण्‍याचे काम प्रस्‍तावित असून संपूर्ण काम दोन टप्‍प्‍यात पूर्ण करण्‍यात येईल. त्यापैकी पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामात ९०० मिलीमीटर व्यासाचे तीन व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वार (वॉल्‍व) सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येणार आहेत. दुसऱ्या टप्‍प्‍यात ९०० मिलीमीटर व्यासाचे ०२ व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येतील.

त्यामुळे सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील.

पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील:-

१) ‘पी उत्तर’– मालाड (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) ‘पी दक्षिण’– गोरेगाव (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

३) ‘आर दक्षिण’– कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा – १ व २, नर्सीपाडा  परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content