Homeमाय व्हॉईसघरावरील हल्ला आणि...

घरावरील हल्ला आणि जाळपोळीच्या वेळी पोलिसांची बघ्याची भूमिका

माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली.

मराठा आरक्षणाच्या विषयावरून झालेल्या चर्चेच्या वेळी सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आरक्षण देतील, हा विश्वासही व्यक्त केला. तसेच, सरकारने हे आरक्षण देताना सामाजिक सलोखा कायम राहील, हे बघावे आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले.

बघ्याची

मराठा आरक्षणाच्या विषयारून ३० ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चातून माजलगावमध्ये माझ्या घरावर दोन तास दगडफेक करून जाळपोळ केली गेली. त्यात एकूण लोक दोन ते तीन हजार असले तरी हल्लेखोर दोनशेच होते. तेही नावावर गुन्हे असलेले समाजकंटक आणि काही राजकीय विरोधकही होते. पण सीसीटीव्ही फूटेज असूनही त्या घटनेशी संबंधित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप बीड माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केला.

माझ्या घरावरील हल्ल्याला चाळीस दिवस झाले पण लोकप्रतिनिधींची घरेदारे जाळायची, कुणाची हॉटेल जाळायची, यामागे कुणीतरी सूत्रधार असला पाहिजे. काही राजकीय नेतेमंडळींनी पोळी भाजून घेतली असेल पण खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलीस जात नाहीत, तोवर उपयोग होणार नाही. हिंसक दंगली बीडमध्ये घडल्या, त्यादिवशी अनेक घटना घडल्या. भाजपाचे कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला, माझ्या लहान बंधूंच्या घरावर हल्ला झाला. मग हे इंटेलिजन्सचे अपयश आहे का… पोलिसांनी माझ्या घरापाशी हल्ले होताना बघ्याची भूमिका का घेतली… हे सर्व प्रश्न आहेत. अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात भीती आहे की असेच हल्ले आमच्या घरावर झाले तर काय करायचे… त्यामुळे यानिमित्ताने निश्चितपणाने गृहमंत्री फडणवीस यांना विनंती करायची आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, एव्हढीच मागणी करतो, असेही सोळंके म्हणाले.

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content