Homeमाय व्हॉईसघरावरील हल्ला आणि...

घरावरील हल्ला आणि जाळपोळीच्या वेळी पोलिसांची बघ्याची भूमिका

माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली.

मराठा आरक्षणाच्या विषयावरून झालेल्या चर्चेच्या वेळी सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आरक्षण देतील, हा विश्वासही व्यक्त केला. तसेच, सरकारने हे आरक्षण देताना सामाजिक सलोखा कायम राहील, हे बघावे आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले.

बघ्याची

मराठा आरक्षणाच्या विषयारून ३० ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चातून माजलगावमध्ये माझ्या घरावर दोन तास दगडफेक करून जाळपोळ केली गेली. त्यात एकूण लोक दोन ते तीन हजार असले तरी हल्लेखोर दोनशेच होते. तेही नावावर गुन्हे असलेले समाजकंटक आणि काही राजकीय विरोधकही होते. पण सीसीटीव्ही फूटेज असूनही त्या घटनेशी संबंधित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप बीड माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केला.

माझ्या घरावरील हल्ल्याला चाळीस दिवस झाले पण लोकप्रतिनिधींची घरेदारे जाळायची, कुणाची हॉटेल जाळायची, यामागे कुणीतरी सूत्रधार असला पाहिजे. काही राजकीय नेतेमंडळींनी पोळी भाजून घेतली असेल पण खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलीस जात नाहीत, तोवर उपयोग होणार नाही. हिंसक दंगली बीडमध्ये घडल्या, त्यादिवशी अनेक घटना घडल्या. भाजपाचे कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला, माझ्या लहान बंधूंच्या घरावर हल्ला झाला. मग हे इंटेलिजन्सचे अपयश आहे का… पोलिसांनी माझ्या घरापाशी हल्ले होताना बघ्याची भूमिका का घेतली… हे सर्व प्रश्न आहेत. अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात भीती आहे की असेच हल्ले आमच्या घरावर झाले तर काय करायचे… त्यामुळे यानिमित्ताने निश्चितपणाने गृहमंत्री फडणवीस यांना विनंती करायची आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, एव्हढीच मागणी करतो, असेही सोळंके म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content