Homeमाय व्हॉईसघरावरील हल्ला आणि...

घरावरील हल्ला आणि जाळपोळीच्या वेळी पोलिसांची बघ्याची भूमिका

माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली.

मराठा आरक्षणाच्या विषयावरून झालेल्या चर्चेच्या वेळी सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आरक्षण देतील, हा विश्वासही व्यक्त केला. तसेच, सरकारने हे आरक्षण देताना सामाजिक सलोखा कायम राहील, हे बघावे आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले.

बघ्याची

मराठा आरक्षणाच्या विषयारून ३० ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चातून माजलगावमध्ये माझ्या घरावर दोन तास दगडफेक करून जाळपोळ केली गेली. त्यात एकूण लोक दोन ते तीन हजार असले तरी हल्लेखोर दोनशेच होते. तेही नावावर गुन्हे असलेले समाजकंटक आणि काही राजकीय विरोधकही होते. पण सीसीटीव्ही फूटेज असूनही त्या घटनेशी संबंधित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप बीड माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केला.

माझ्या घरावरील हल्ल्याला चाळीस दिवस झाले पण लोकप्रतिनिधींची घरेदारे जाळायची, कुणाची हॉटेल जाळायची, यामागे कुणीतरी सूत्रधार असला पाहिजे. काही राजकीय नेतेमंडळींनी पोळी भाजून घेतली असेल पण खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलीस जात नाहीत, तोवर उपयोग होणार नाही. हिंसक दंगली बीडमध्ये घडल्या, त्यादिवशी अनेक घटना घडल्या. भाजपाचे कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला, माझ्या लहान बंधूंच्या घरावर हल्ला झाला. मग हे इंटेलिजन्सचे अपयश आहे का… पोलिसांनी माझ्या घरापाशी हल्ले होताना बघ्याची भूमिका का घेतली… हे सर्व प्रश्न आहेत. अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात भीती आहे की असेच हल्ले आमच्या घरावर झाले तर काय करायचे… त्यामुळे यानिमित्ताने निश्चितपणाने गृहमंत्री फडणवीस यांना विनंती करायची आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, एव्हढीच मागणी करतो, असेही सोळंके म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content