Skip to content
Homeमुंबई स्पेशलकोल्हापूरकरांच्या मदतीला मुंबई...

कोल्हापूरकरांच्या मदतीला मुंबई महापालिका धावली!

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्याच्या अनुषंगाने शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छ करण्यासाठी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेल्या चमूकडून कामाला सुरूवात झाली आहे.

कोल्हापूरमध्ये पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी बॄहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कोल्हापूर शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्राची मदत देण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यानुसार पालिकेने तातडीने स्वच्छतेच्या कामासाठी चमू रवाना करण्यात आला. या चमूने कोल्हापुरातील शाहूपुरी भागात काम सुरू केले आहे.

कनिष्ठ अभियंता आकाश रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापूरकरीता काल रवाना केली गेली. या चमूमध्ये प्रत्येक संयंत्रासोबत चार जणांचे मनुष्यबळ आहे. दोन्ही संयंत्रांसोबत एकूण ८ जण कोल्हापुरात आज दाखल झाले आहेत. या चमूमध्ये वाहनचालक, तंत्रज्ञ, कामगार यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे.

सन २०१९, २०२१मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती.    

Continue reading

जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

भविष्यात तंत्रज्ञान विकसित करण्या करिता कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा सशक्तीकरण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा पुरस्करार्थी मोहम्मद आरिफ खान यांनी नुकतेच केले. युज नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मार्क मार्शल आर्ट्स, भारत सरकार...

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...