Homeचिट चॅट30 सप्टेंबरला पणजीत...

30 सप्टेंबरला पणजीत टपाल खात्याची अदालत

भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही टपाल अदालत आयोजित केली जाईल.

तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने टपाल विभागातर्फे वेळोवेळी अशा लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने टपाल विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींची माहिती संकलित करतात आणि त्यांचे लवकरत लवकर निराकरण व्हावे म्हणून कार्यवाहीला सुरुवात करतात. गोवा क्षेत्राशी  संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी 6 आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या अदालतीत टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारीदेखील ऐकल्या जाणार आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तारखा, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती, त्यांचे पद अशा स्वरुपातील माहिती देणे अपेक्षित आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या टपाल सेवांबाबतच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी- 403001 या पत्त्यावर 20 सप्टेंबर 2025पर्यंत पाठवू शकतात.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content