Homeचिट चॅट30 सप्टेंबरला पणजीत...

30 सप्टेंबरला पणजीत टपाल खात्याची अदालत

भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही टपाल अदालत आयोजित केली जाईल.

तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने टपाल विभागातर्फे वेळोवेळी अशा लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने टपाल विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींची माहिती संकलित करतात आणि त्यांचे लवकरत लवकर निराकरण व्हावे म्हणून कार्यवाहीला सुरुवात करतात. गोवा क्षेत्राशी  संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी 6 आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या अदालतीत टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारीदेखील ऐकल्या जाणार आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तारखा, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती, त्यांचे पद अशा स्वरुपातील माहिती देणे अपेक्षित आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या टपाल सेवांबाबतच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी- 403001 या पत्त्यावर 20 सप्टेंबर 2025पर्यंत पाठवू शकतात.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content