Homeचिट चॅटसिबिईयु शालेय कॅरम...

सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेत तनया दळवी अजिंक्य

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने पटकाविले. महात्मा गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने संपूर्ण डावात अचूक खेळासह राणीवर कब्जा राखत पोद्दार अकॅडमी-मालाडचा उदयोन्मुख कॅरमपटू प्रसन्न गोळेचा  निसटता पराभव केला.

प्रारंभी आघाडी घेऊनही प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्काराने गौरविण्यात आले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु संस्थेच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्तचा हा मोफत क्रीडा उपक्रम युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये तनया दळवीने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला तर प्रसन्न गोळेने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेला पराभूत केले. ध्रुव शाह, आर्यन राऊत, नील म्हात्रे, संचिता मोहिते यांनी उपांत्यपूर्व तर श्रीशान पालवणकर, वेदांत राणे, ध्रुव भालेराव, केवल कुलकर्णी, ग्रीष्मा धामणकर, वेदांत लोखंडे, प्रेक्षा जैन, अद्वैत पालांडे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर व ओमकार चव्हाण यांनी प्रमुख पंचाचे कामकाज केले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४४ कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. कामगार दिनी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभासदांच्या १६ वर्षांखालील पाल्यांसाठी विनाशुल्क सुपर लीग कॅरम पात्रता फेरी २० एप्रिलला दादर येथे होणार आहे.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content