Homeचिट चॅटसिबिईयु शालेय कॅरम...

सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेत तनया दळवी अजिंक्य

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने पटकाविले. महात्मा गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने संपूर्ण डावात अचूक खेळासह राणीवर कब्जा राखत पोद्दार अकॅडमी-मालाडचा उदयोन्मुख कॅरमपटू प्रसन्न गोळेचा  निसटता पराभव केला.

प्रारंभी आघाडी घेऊनही प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्काराने गौरविण्यात आले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु संस्थेच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्तचा हा मोफत क्रीडा उपक्रम युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये तनया दळवीने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला तर प्रसन्न गोळेने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेला पराभूत केले. ध्रुव शाह, आर्यन राऊत, नील म्हात्रे, संचिता मोहिते यांनी उपांत्यपूर्व तर श्रीशान पालवणकर, वेदांत राणे, ध्रुव भालेराव, केवल कुलकर्णी, ग्रीष्मा धामणकर, वेदांत लोखंडे, प्रेक्षा जैन, अद्वैत पालांडे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर व ओमकार चव्हाण यांनी प्रमुख पंचाचे कामकाज केले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४४ कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. कामगार दिनी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभासदांच्या १६ वर्षांखालील पाल्यांसाठी विनाशुल्क सुपर लीग कॅरम पात्रता फेरी २० एप्रिलला दादर येथे होणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content