Homeमुंबई स्पेशलमुंबईत आरटीईंतर्गत प्रवेश...

मुंबईत आरटीईंतर्गत प्रवेश घ्या २५ मार्चपर्यंत!

शैक्षणिक हक्क कायद्यानुसार अर्थात ‘आरटीई’नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने बालकांना प्रवेश घेण्‍यासाठी १७ मार्च २०२३पर्यंत अंतिम मुदत देण्‍यात आली होती. तथापि, पालकांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्‍या निर्देशांनुसार ही मुदत दि. २५ मार्च २०२३पर्यंत वाढविण्‍यात आली आहे.

याबाबतची अर्ज प्रक्रिया व संबंधित माहिती https://student.maharashtra.gov.in किंवा http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजू तडवी यांनी कळविली आहे.

बृहन्‍मुंबई महापालिका – शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष २०२३–२४करिता बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्‍पसंख्‍यांक शाळा वगळून) प्रवेशाच्‍या सुरुवातीच्‍या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्‍या २५ टक्के जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रि‍येच्‍या प्रणालीद्वारे भरण्‍यासाठी दि. १ मार्च ते १७ मार्च २०२३पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, पालकांच्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता दि. २५ मार्च २०२३पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, दि. २५ मार्च २०२३नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असेही शिक्षणाधिकारी तडवी यांनी कळविले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content