Monday, March 10, 2025
Homeचिट चॅटश्री उद्यानगणेश मंदिर...

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षांखालील इयत्ता १०वीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा येत्या १० व ११ जानेवारीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या ३२ व मुलींच्या १६ शालेय कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूंना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार दिला जाईल.

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु. ५,०००/- (पाच हजार), अंतिम उपविजेत्यास रोख रु. ३,०००/-, तृतीय क्रमांकास रोख रु. २,०००/- व चतुर्थ क्रमांकास रु. १,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित मुलांच्या किंवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी अध्यक्ष व स्पर्धाप्रमुख प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय आईर (८६५५२३३७७८), श्री उद्यान गणेश मंदिर कार्यालय (०२२-२४४६६६३४), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे संपर्क साधावा.

Continue reading

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...

प्रकल्प रद्द करायला मी काही उद्धव ठाकरे नाही!

प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील भाषणांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांत प्रकल्प...
Skip to content