Homeबॅक पेजनेपाळच्या मुक्तीनाथ मंदिरातल्या...

नेपाळच्या मुक्तीनाथ मंदिरातल्या ‘बिपिन बेल’ला अभिवादन!

दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ फेब्रुवारी 2023मध्ये मुक्तीनाथ मंदिर परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ‘बिपिन बेल’ला लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंह यांनी काल अभिवादन केले. सिंह 16 जानेवारी 2024पासून नेपाळच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

दक्षिण कमांड आणि गोरखा ब्रिगेडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंग, (AVSM, YSM, SM, VSM GOC-in-C) यांनी नेपाळमधील मुस्तांग इथल्या थरांग ला खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या मुक्तिनाथ मंदिराला भेट दिली.

दिवंगत सैन्यदलप्रमुख, जनरल बिपिन रावत हे स्वतः गोरखा अधिकारी होते आणि नेपाळ राष्ट्र तसेच नेपाळच्या जनतेशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. भारत आणि नेपाळच्या लष्करातील मैत्री आणि बंधूभाव अधिकाधिक दृढ करण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. बिपिन रावत यांची या मंदिरावर श्रद्धा होती, आणि 2021 साली ह्या देवळात जाण्याचे नियोजनही त्यांनी केले होते. मात्र, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ही भेट होऊ शकली नाही. म्हणूनच या मंदिरात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही घंटा लावण्याला विशेष महत्त्व आहे.

फेब्रुवारी 2023मध्ये, चार माजी भारतीय लष्करप्रमुख, व्ही. एन. शर्मा, जनरल जे. जे. सिंह, जनरल दीपक कपूर आणि जनरल दलबीर सुहाग, जे नेपाळ लष्कराचे मानद जनरल्सदेखील आहेत, त्यांनी आपल्या भेटीदरम्यान, या पवित्र मंदिरात ही घंटा म्हणजेच बेल स्थापन केली होती. हे चौघे 2023 साली नेपाळ लष्कराच्या 260व्या वर्धापनदिनाच्या समारंभात सहभागी होण्यास गेले होते.

यावेळी, लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंह यांनी नेपाळ लष्करप्रमुख, जनरल प्रभू राम शर्मा यांचीही भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये, भारत आणि नेपाळमधील लष्करी द्वीपक्षीय संबंध अधिक बळकट करून, दोन्ही लष्करातील परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

पोखरा, बागलुंग, धरण आणि काठमांडू या भागातील दौऱ्यादरम्यान, त्यांनी मूळ नेपाळ रहिवासी गोरखा माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी विविध माजी सैनिकांच्या रॅलीमधून संवाद साधला आणि त्या सर्वांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध कल्याणकारी उपाययोजनांची तसेच भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या इतर उपक्रमांची माहिती दिली.

Continue reading

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...
Skip to content