Homeबॅक पेजपर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय...

पर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय मुंबईतले शिल्पग्राम उद्यान

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यानजीक जोगेश्वरीतल्या पूनमनगर येथे आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती यांच्या संकल्पनेवर आधारित हे उद्यान बारा बलुतेदारबरोबर प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पेही विविध भागात उभारण्यात आली आहेत. सध्या हे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

शिल्पग्राममध्ये या शिल्पांसोबत लहान मुलांना खेळण्याची विविध उपकरणे, संगीतमय कारंजेदेखील उपलब्ध आहेत. खुला रंगमंच, आकर्षक पायवाटा, हिरवळ इत्यादी सुविधांची उपलब्धता असल्याने अनेक आबालवृद्ध त्याचा लाभ घेत आहेत. शिल्पग्राम उद्यान ५५,००० चौ.मी क्षेत्रफळावर वसले असून उद्यान, खेळ, संगीतमय कारंजे, दिव्यांगांसाठी विशेष उपकरणे तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

या सुविधांसोबतच विविध प्रकाराच्या वनस्पती, वेली, फुलझाडे, यांनी शिल्पग्रामची शोभा वाढवली आहे. सध्या बहावा, ताम्हण, सोनमोहोर, चाफा, कैलासपती, कांचन, इत्यादी वृक्ष फुलांनी बहरलेले आहेत. बचतगटांच्या विविध उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळवण्याच्या हेतूने शिल्पग्राममध्ये आठवडी बाजारदेखील भरविण्यात येतो. एकंदर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमजा, खेळाबरोबर सुंदर हिरवाई पाहण्यासाठी सर्व आबालवृद्धांनी शिल्पग्रामला भेट नक्की द्यायला हवी, असे मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

शिल्पग्राम बुधवार वगळता सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांच्या वापराकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. शिल्पग्राममध्ये प्रौढांकरिता  रु. १०/-, तसेच १२ वर्षांखालील मुलांसाठी ५/- प्रवेश शुल्क आकारण्यात येते. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना शिल्पग्राममध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content