Homeबॅक पेजदेशातल्या ७ शक्तिपीठांवर...

देशातल्या ७ शक्तिपीठांवर होतोय ‘शक्ती’ महोत्सव

देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाखालील संगीत नाटक अकादमी, या स्वायत्त संस्थेकडून कालपासून 17 एप्रिलपर्यंत विविध सात शक्तिपीठांत ‘शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सव’ नावाचा महोत्सव आयोजित केला आहे.

नवरात्र म्हणजे नऊ देवींच्या सामर्थ्याचे द्योतक मानले गेले असल्याने, अकादमी ‘शक्ती’ या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा करत असून या अंतर्गत देशाच्या विविध भागांत 9 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत सात भिन्न शक्तिपीठांच्या ठिकाणी, मंदिर परंपरा साजरी करणारे कार्यक्रम होतील. कालपासून चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. याचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शक्ती महोत्सवाचा उद्घाटनपर कार्यक्रम गुवाहाटी येथे कामाख्या मंदिर येथे सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील ज्वालामुखी मंदिर, त्रिपुरामधील उदयपूर येथील त्रिपुरसुंदरी मंदिर, गुजरातमध्ये बनासकांठा येथील अंबाजी मंदिर, झारखंडमधील देवघर येथील जलदुर्गा शक्तिपीठ येथे तो सुरू राहील. मध्य प्रदेशात उज्जैनमधील जयसिंगपूर येथील माँ हरसिद्धी मंदिर या शक्तिपीठावर त्याचा समारोप होईल.

रंगमंचीय कलाविष्कारांची राष्ट्रीय अकादमी असणारी संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. देशातील रंगमंचीय कलाप्रकारांचे संरक्षण, त्यांवर संशोधन, त्यांना प्रोत्साहन आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आणि आदिवासी कला तसेच देशातील इतर कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर व्यक्त होणाऱ्या कलेसाठी ही संस्था काम करते‌.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content