Homeएनसर्कलथायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार...

थायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार उभारा!

थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे. त्यासाठी थायलँड सरकारने जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

बँकॉक येथील दौऱ्यात त्यांनी थायलँडचे संरक्षणमंत्री डॉ. सुतीन कुंगसंग यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची मागणी केली. यावेळी थायलँड पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख पीआरओ डॉ. जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या. त्यानंतर थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्ध विहार आणि डॉ. आंबेडकर आंतराष्ट्रीय केंद्रासाठी जमीन थायलँड सरकारतर्फे देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कुगसंग यांनी दिले.

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी केला. जगभर बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी केला. सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन भारतात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यांनी मानवतेच्या, समतेच्या विचारांसाठी उभारलेला मानवमुक्तीचा लढा; त्यांनी भारतात केलेले धम्मचक्र प्रवर्तन याची जगात नोंद झाली आहे. त्यामुळे थायलँडमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी डॉ. कुंगसंग यांना केली.

थायलँडमध्येही आठवलेंचे दिसले व्याघ्रप्रेम

थायलँड दौऱ्यात रामदास आठवले यांनी बँकॉक पट्टाया येथील टायगर पार्कला सहकुटूंब भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा, पुत्र जित, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, उद्योजक राज वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content