Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः रोहित मिरजकरची विजयी सलामी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत पुण्याच्या रोहित मिरजकरने मुंबईच्या श्रीकृष्ण प्रधानचा २५-०, २०-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी चेंबूर जिमखान्याच्या अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी चेंबूर जिमखान्याचे मानद सरचिटणीस डॉ. मनिष शर्मा, प्रशासकीय मानद सरचिटणीस श्याम अगरवाल, सल्लागार सुरिंदर शर्मा, कॅरम विभाग सचिव बाळकृष्ण परब, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभय हडप तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरी गटाचे इतर निकाल पुढीलप्रमाणे-

बाळकृष्ण मते (ठाणे) वि वि राकेश शेट्ये (मुंबई उपनगर) २५-७, २४-५

आतिष कल्याणकर (रायगड) वि वि सुदर्शन पैठणकर (मुंबई उपनगर) २५-०, २०-१६

मनोज बेकार (मुंबई) वि वि संजीव मुळगावकर (पालघर) २५-१४, १२-९

प्रशांत म्हात्रे (सिंधुदूर्ग) वि वि उदय बने (मुंबई उपनगर) २५-११, ३-२५, २५-३

हर्षद डांगी (मुंबई उपनगर) वि वि कलीम अहमद अन्सारी (धुळे) ०-२५, २५-१९, २३-१३

अमर भोसले (मुंबई उपनगर) वि वि विक्रांत नाईक (मुंबई) १७-९, १-२५, २५-६

संतोष जाधव (मुंबई) वि वि रईस शेख (जळगाव) २२-१२, २५-१०

निरंजन चारी (पालघर) वि वि महर्षी देसाई (मुंबई उपनगर) २५-०, २५-९

अब्दुल शेख (मुंबई उपनगर) वि वि दयानंद चोथे (ठाणे) २५-११, १३-१७, २५-१६

मेहराज शेख (नाशिक) वि वि रमेश ह्सगेकर (मुंबई उपनगर) २५-०, २५-०

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content