Homeमाय व्हॉईसभारताच्या एकता आणि...

भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे अयोध्येतील श्री राम मंदिर!

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिराच्या स्वरूपात ही भक्ती मूर्त रूप धारण करत आहे. हे भव्य मंदिर केवळ भव्यतेच्या बाबतीतच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या योगदानाच्या माध्यमातूनही भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पना या मंदिरासमवेत प्रतिध्वनीत होत आहे. मंदिराच्या तीर्थयात्रेत राष्ट्राला एकत्र आणत कोणत्याही सीमेपलीकडे जात एक अतूट विश्वास आणि उदारतेचा हे मंदिर दाखला देते.

मंदिराचा गाभारा राजस्थानच्या मकराना संगमरवराच्या मूळ पांढर्‍या नजाकतीने सुशोभित आहे.  कर्नाटकातील चर्मोथी वाळूच्या दगडाने, देवतांच्या मूर्ती घडवल्या आहेत. तर राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वारावरील आकृतीमध्ये वापरण्यात आला आहे.

संपूर्ण देशाचे हे योगदान केवळ बांधकाम साहित्यापुरते मर्यादीत नाही, तर त्याही पलीकडे आहे.  गुजरातचा दानशूरपणा ध्वनित करत गुजरातमधून आलेली एक भव्य 2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा, मंदिराच्या भव्य दालनात वातावरण नादमय करेल. या दैवी घंटेसोबतच, अखिल भारतीय दरबार समाजाने तयार केलेला नगारा नेणारा 700 किलो वजनाचा रथदेखील, गुजरातने दिला आहे. प्रभू रामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा पाषाण कर्नाटकातील आहे.  हिमालयाच्या पायथ्यापासून ते अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या भागांमधून, या तिर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार म्हणून उभे असलेले नाजूक कोरीवकाम केलेले लाकडी दरवाजे आणि हाती विणलेले वस्त्र आले आहे.

योगदानांची यादी इथेच संपत नाही. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातील, तर पॉलिश केलेले सागवानी लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. राममंदिराची कथा केवळ साधने आणि भौगोलिक योगदानाशीच निगडीत नाही. राम मंदिर निर्मितीची ही प्रक्रिया, या पवित्र कामात आपले शरीर, मन, आत्मा आणि कौशल्य ओतलेल्या असंख्य प्रतिभावान कारागीर आणि हस्तकला कारागीरांची कथा विदीत करते.

राम मंदिर हे अयोध्येतील केवळ एक वास्तू नव्हे, श्रद्धेच्या एकत्रित सामर्थ्याचा तो जिवंत वस्तुपाठ आहे. प्रत्येक पाषाण, प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक घंटा, प्रत्येक वस्त्र-कापड, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची कथा सांगते. ही कथा भौगोलिक सीमा ओलांडून सामूहिक आध्यात्मिक प्रवासात असंख्य मने परस्परांशी जोडते.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content