Homeएनसर्कलमर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय...

मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे शानदार यश

जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकूण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश होता.

या स्पर्धेत १६ राज्यांतून ३७८ खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी दाखवण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच दाद मिळवली. या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन खडसे यांनी दिले. यावेळी संघटनेचे साऊथ एशिया अध्यक्ष मंदार पनवेलकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मिंग, राष्ट्रीय महासचिव संतोष खंदारे, राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते आणि सचिव विनोद कुंजीरदेखील उपस्थित होते. सोहम सावंत संघाचे प्रशिक्षक होते. व्यवस्थापक म्हणून रोहित थाळी संघासोबत होते.

स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू:

सुवर्णः वरद केणी, अनिकेत दुशिंग, प्रज्वल दरेकर, कौस्तुभ जोशी, अंगत कदम, अथर्व मदने, निकुंज पिंगळे, फिरोज अन्सारी, सृष्टी पवार, वासुसेन जुनघरे.

रौप्यः तनिषा शेणपती, आदित्य भागवत, अवनीश कंक, वर्धन कदम.

कांस्यः मनोज भंडारी, करण शिरोडकर, पार्थवी भांड.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content