Homeएनसर्कलमर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय...

मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे शानदार यश

जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकूण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश होता.

या स्पर्धेत १६ राज्यांतून ३७८ खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी दाखवण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच दाद मिळवली. या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन खडसे यांनी दिले. यावेळी संघटनेचे साऊथ एशिया अध्यक्ष मंदार पनवेलकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मिंग, राष्ट्रीय महासचिव संतोष खंदारे, राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते आणि सचिव विनोद कुंजीरदेखील उपस्थित होते. सोहम सावंत संघाचे प्रशिक्षक होते. व्यवस्थापक म्हणून रोहित थाळी संघासोबत होते.

स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू:

सुवर्णः वरद केणी, अनिकेत दुशिंग, प्रज्वल दरेकर, कौस्तुभ जोशी, अंगत कदम, अथर्व मदने, निकुंज पिंगळे, फिरोज अन्सारी, सृष्टी पवार, वासुसेन जुनघरे.

रौप्यः तनिषा शेणपती, आदित्य भागवत, अवनीश कंक, वर्धन कदम.

कांस्यः मनोज भंडारी, करण शिरोडकर, पार्थवी भांड.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content