Homeकल्चर +पं. कान्हेरे, पं....

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड, संजय मोने, चिन्मयी सुर्वे आदींचा समावेश आहे.

जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:

जव्हेरी संगीत शिक्षक पुरस्कार- पं. विश्वनाथ कान्हेरे

सोमाणी ज्येष्ठ कलावंत- पं. अरूण द्रविड

ज्येष्ठ रंगकर्मी- संजय मोने

नाट्यदिग्दर्शक- डॉ. विवेक बेळे

समीक्षक- भालचंद्र कुबल

आईची भूमिका- चिन्मयी सुर्वे

संगीत विशारद- ऋत्विक आठवले, श्रृती पोटे

संगीत नाटकातील अभिनेत्री-  सावनी शेवडे

याचवेळी गाथा सप्तशतिपासून आजपर्यंत बदलत गेलेली भाषेची रुपे गाणे व अभिवाचन यातून उलगडून दाखवणारा `इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रमदेखील होणार आहे. ‘इये मराठीचिये नगरी’.. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. त्याची संकल्पना, संहिता, बांधणी व सहभाग डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा आहे. गिरीश दातार व गौरी देशपांडे यावेळी अभिवाचन करतील तर नेहा देशपांडे व समीहन सहस्त्रबुद्धे गायन करतील.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content