Homeएनसर्कलप्रा. तु. शं....

प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे निधन

मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.

तु. शं. हे दीर्घकाळ औरंगाबाद येथे सरस्वती भुवन कला – वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक / विभागप्रमुख होते. त्यांनी कथा, काव्य आणि समीक्षा लिहिली. प्रा. प्रकाश मेदककर यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन – संपादन केले आहे. साहित्य अकादमीसाठी आधुनिक मराठी कवितांचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रा. कुळकर्णी यांनी संपादित केला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेशी आणि परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाशी ते अनेक वर्षे निगडीत होते. परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला होता. नरहर कुरुंदकर यांचे ते निकटचे स्नेही होते.

अनेकांनी प्रा. तु. शं. कुळकर्णी यांना औरंगाबादेत समर्थनगर ते सरस्वती भुवन परिसर आणि समर्थनगर ते साहित्य परिषद या रस्त्यावर पायी चालताना अनेकदा पाहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत. 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content