Homeन्यूज ॲट अ ग्लांसरामनवमीनिमित्त पंतप्रधान मोदी...

रामनवमीनिमित्त पंतप्रधान मोदी उद्या श्रीलंकेहून थेट तामिळनाडूत

गेल्या दोन दिवसांपासून बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने थायलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल श्रीलंकेला पोहोचले. श्रीलंका दौऱ्यावरून परतताना उद्या ते थेट रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूला भेट देणार आहेत. तेथे ते रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण होणार आहे. रामेश्वरम-तांबाराम (चेन्नई) या नवीन रेल्वेलाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते नव्या पंबन रेल्वे पुलाचे (भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे) उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील. त्यानंतर दुपारी पाऊणच्या सुमारास ते रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. दुपारी दिडच्या सुमारास ते रामेश्वरममध्ये 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच राष्ट्रार्पण करतील. यावेळी पंतप्रधान मोदी एका मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान

रामायणातल्या दाखल्यानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते. त्यामुळे या पुलाला एक सखोल सांस्कृतिक महत्त्व आहे. रामेश्वरम द्विपला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय नमुना असून त्याच्या बांधकामासाठी 550 कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाची लांबी 2.8 किलोमीटर आहे. 99 स्पॅन इतका विस्तार असून 72.5 मीटर उर्ध्व विस्तार आहे. 17 मीटर उंचीपर्यंत वर उचलण्याची क्षमता असल्याने रेल्वे आणि जहाजांची ये-जा सहज होऊ शकणार आहे. पोलादी बळकटीकरण, उच्च दर्जाचे संरक्षणात्मक रंग आणि पूर्णपणे जोडणीसह बांधलेला असल्याने पुलाचा टिकाऊपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे देखभालखर्च कमी लागणार आहे. भविष्यातील गरजा सामावून घेण्यासाठी दुहेरी लोहमार्ग टाकता येतील, या पद्धतीची रचनादेखील तेथे करण्यात आली आहे. सागरी वातावरणाचा विचार करून या पुलाला पॉलीसिलोक्सेन कोटिंग केले असून त्यामुळे त्याचे गंजण्यापासून रक्षण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूत 8,300 कोटींचे विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करून राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमध्ये एनएच-40च्या 28 किलोमीटर लांबीच्या चौपदरी वालजापेट-रानीपेट महामार्गाचे भूमिपूजन, पुद्दूचेरी विभागातल्या एन एच 332वरच्या विलूप्पूरम – पुद्दूचेरी या 29 किमी लांबीच्या महामार्गचे लोकार्पण, एनएच -32वरच्या पुंडियंकूपम – सट्टनाथपुरम विभागातल्या 57 किमी लांबीच्या मार्गाचे, एनएच 36च्या चोलपुरम – तंजावर या 48 किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण होणार असून हे महामार्ग अनेक तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळांना जोडतील. शहरांमधील अंतर कमी करतील आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास मदत करतील. स्थानिक शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनांना जवळच्या बाजारपेठेत वाहतूक करण्यास आणि स्थानिक चामड्याच्या, लघुद्योगांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देण्यास सक्षम करतील.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content