Homeन्यूज ॲट अ ग्लांसरामनवमीनिमित्त पंतप्रधान मोदी...

रामनवमीनिमित्त पंतप्रधान मोदी उद्या श्रीलंकेहून थेट तामिळनाडूत

गेल्या दोन दिवसांपासून बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने थायलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल श्रीलंकेला पोहोचले. श्रीलंका दौऱ्यावरून परतताना उद्या ते थेट रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूला भेट देणार आहेत. तेथे ते रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण होणार आहे. रामेश्वरम-तांबाराम (चेन्नई) या नवीन रेल्वेलाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते नव्या पंबन रेल्वे पुलाचे (भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे) उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील. त्यानंतर दुपारी पाऊणच्या सुमारास ते रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. दुपारी दिडच्या सुमारास ते रामेश्वरममध्ये 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच राष्ट्रार्पण करतील. यावेळी पंतप्रधान मोदी एका मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान

रामायणातल्या दाखल्यानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते. त्यामुळे या पुलाला एक सखोल सांस्कृतिक महत्त्व आहे. रामेश्वरम द्विपला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय नमुना असून त्याच्या बांधकामासाठी 550 कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाची लांबी 2.8 किलोमीटर आहे. 99 स्पॅन इतका विस्तार असून 72.5 मीटर उर्ध्व विस्तार आहे. 17 मीटर उंचीपर्यंत वर उचलण्याची क्षमता असल्याने रेल्वे आणि जहाजांची ये-जा सहज होऊ शकणार आहे. पोलादी बळकटीकरण, उच्च दर्जाचे संरक्षणात्मक रंग आणि पूर्णपणे जोडणीसह बांधलेला असल्याने पुलाचा टिकाऊपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे देखभालखर्च कमी लागणार आहे. भविष्यातील गरजा सामावून घेण्यासाठी दुहेरी लोहमार्ग टाकता येतील, या पद्धतीची रचनादेखील तेथे करण्यात आली आहे. सागरी वातावरणाचा विचार करून या पुलाला पॉलीसिलोक्सेन कोटिंग केले असून त्यामुळे त्याचे गंजण्यापासून रक्षण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूत 8,300 कोटींचे विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करून राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमध्ये एनएच-40च्या 28 किलोमीटर लांबीच्या चौपदरी वालजापेट-रानीपेट महामार्गाचे भूमिपूजन, पुद्दूचेरी विभागातल्या एन एच 332वरच्या विलूप्पूरम – पुद्दूचेरी या 29 किमी लांबीच्या महामार्गचे लोकार्पण, एनएच -32वरच्या पुंडियंकूपम – सट्टनाथपुरम विभागातल्या 57 किमी लांबीच्या मार्गाचे, एनएच 36च्या चोलपुरम – तंजावर या 48 किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण होणार असून हे महामार्ग अनेक तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळांना जोडतील. शहरांमधील अंतर कमी करतील आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास मदत करतील. स्थानिक शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनांना जवळच्या बाजारपेठेत वाहतूक करण्यास आणि स्थानिक चामड्याच्या, लघुद्योगांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देण्यास सक्षम करतील.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content