Homeबॅक पेजराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती बारीपाडा येथे अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सवाच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील. त्याच दिवशी त्या कुलियाना येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेचे उद्घाटनही करणार आहेत.

21 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पहाडपूर गावात कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर त्या बादामपहाड रेल्वे स्थानकाला भेट देतील आणि तीन नवीन गाड्यांना (बादामपहाड- टाटानगर मेमू, बादामपहाड-राउरकेला साप्ताहिक एक्सप्रेस आणि बादामपहाड-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस) हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील, नवीन रायरंगपूर टपाल विभागाचे उद्घाटन करतील, रायरंगपूर टपाल विभागाच्या स्मरणार्थ लिफाफा प्रकाशित करतील, आणि बदमपहार रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील. त्या बदमपहार-शालीमार एक्स्प्रेसमधून बदमपहार ते रायरंगपूर दरम्यान प्रवास करतील. त्याच दिवशी संध्याकाळी बुर्ला येथील वीर सुरेंद्र साई तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 15 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील.

22 नोव्हेंबर रोजी, राष्ट्रपती संबलपूर येथे ब्रह्मकुमारी, संबलपूर द्वारा आयोजित ‘नवीन भारतासाठी नवीन शिक्षण’ या राष्ट्रीय शैक्षणिक मोहिमेचा शुभारंभ करतील. नंतर, राष्ट्रपती पुट्टपर्थीला भेट देतील जिथे त्या श्री सत्य साई उच्च शिक्षण संस्थेच्या 42 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content