Homeबॅक पेजपेटीएमने केली ट्रॅव्‍हल...

पेटीएमने केली ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने पेटीएम ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे. ५ ऑक्‍टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास ५,००० रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्‍जवर २५ टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास ५०० रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात.

कंपनीने वापरकर्त्‍यांना अतिरिक्‍त बचत देण्‍यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक अशा आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास १५ टक्‍के सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास १० टक्‍के सूटचा लाभ घेण्‍यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी ‘आयसीआयसीआयसीसी’, आरबीएल बँकेसाठी ‘फ्लायआरबीएल’, बँक ऑफ बडोदासाठी ‘बॉबसेल’ व एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसाठी ‘एयूसेल’. तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्‍फर्म रेल्‍वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्‍ज यूपीआयच्‍या माध्‍यमातून विनाशुल्‍क दिली जातात. वापरकर्ते रेल्‍वे तिकिटांसाठी फक्‍त ४९ रूपयांपासून मोफत कॅन्‍सलेशनचादेखील अवलंब करू शकतात.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले की, सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्‍यांच्‍या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्‍हाला विशेष ऑफर्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे. त्यामुळे त्‍यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्‍वे व बसेसवर बचत देण्‍याचा मानस आहे, ज्‍यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content