Homeएनसर्कल‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून “ऑपरेशन थिरवल्लूर” सुरू केले आहे.

लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर जिल्ह्यातील गुम्मीडीपुंडी येथील राज्य औद्योगिक विकास  महामंडळ तामिळनाडू मर्यादितच्या औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रात जुन्या कारखान्यातून कदाचित अनावधानाने गोळा केलेल्या, स्फोट न झालेल्या 10 टन दारूगोळ्यांची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्यात आली.

नागरी अधिकाऱ्यांबरोबर तपशीलवार नियोजन आणि सहकार्यातून गेल्या अनेक आठवड्यांपासून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा हा प्रत्यत्न सुरू असून ही एक उत्कृष्ट मोहीम आहे. लष्कर आणि तामिळनाडू राज्य सरकार यांच्या संयुक्त समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून हे करण्यात आले. त्यांच्या विनंतीवरून संरक्षण मंत्रालयाने या मोहिमेला विशेष मान्यता दिली.

गुम्मीडीपुंडी आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत, धातूचे भंगार असलेल्या  दारुगोळ्याच्या कोठारातून सापडलेल्या, स्फोट झाला नसलेल्या आयुधांचे वर्गीकरण करून आणि त्याची विल्हेवाट लावल्यानंतर, ती आता जमिनीखाली पुरण्यात आली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक स्फोटात एका कारखान्यातील कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हे दारुगोळ्याचे कोठार उघडकीला आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content