Homeएनसर्कलमहापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर द्या...

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर द्या वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी ६ डिसेंबर, या त्यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी, असे आवाहन आंबेडकर कुटुंबियांसह विविध मान्यवरांनी केले आहे.

महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करताना वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व ‘एक वही, एक पेन’ अभियानच्या वतीने नेहमी करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संघर्ष, शैक्षणिक अर्हता तसेच त्यांनी जनतेला दिलेला शिक्षणाचा संदेश लक्षात घेता हा संदेश अंमलात आणण्यासाठी, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर येताना वह्या, पेन, पुस्तकांची व इतर शैक्षणिक साहित्य घेऊन यावे असे आवाहन बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर व रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

सदर साहित्याचे संकलन करण्यासाठी चैत्यभूमीशेजारील दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक तसेच चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ भागोजी कीर पुतळा येथे संकलन केंद्र असून याठिकाणी सदर साहित्य जमा करण्यात यावे, असे महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे. 

दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पहिल्या महिला लोकशाहीरा सीमाताई पाटील, भीम आर्मीचे अशोक कांबळे, सीताराम गंगावणे, कला निर्माता, दिग्दर्शक जॉली मोरे, आरपीआय नेते राजाराम खरात, दिलीपदादा जगताप, कामगार नेते रमेश कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव, भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे, समता सैनिक दल, बौध्द भंते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीदेखील एक वही, एक पेन… अभियानाला बळकटी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक आदरांजली द्यावी, असे आवाहन केले आहे.

सदर अभियानात सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content