Sunday, September 8, 2024
Homeमुंबई स्पेशलघर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध...

घर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध ३०७ कलमाखाली गुन्हे!

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

बीड जिल्ह्यात घरात माणसं असताना बाहेरून घर पेटवून देण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचे सर्व व्हिडिओ मिळाले असून 50 ते 55 जणांना ओळखण्यात आले आहे. या सर्वांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घरे जाळणे किंवा मालमत्ता जाळणे असे प्रकार पोलीस खपवून घेणार नाहीत. जिथे शांततेत आंदोलन चालू आहे तेथे पोलीस त्यांना विरोध करणार नाहीत. मात्र जिथे हिंसाचार होईल तेथे पोलीस कडक कारवाई करतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

काही लोक या आंदोलनाचा फायदा घेत हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये काही हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठान पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि याची गंभीर दखल गृह विभागाने तसेच पोलिसांनी घेतली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. या कार्यकर्त्यांच्या सहभागाची खात्री पटल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content