Homeटॉप स्टोरीआता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये...

आता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये रंगणार चिन्हावरुन सामना!


आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानंतर हा सामना सुरू झाल्याचे बोलले जाते.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील पोस्टर्स, बॅनर तसेच शाखांबाहेर लावलेल्या बोर्डांवरील धनुष्यबाण चिन्हं काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मुंबईतल्या प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डावर तिथे असलेले धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिवसेनेकडून याबद्दल एकमेकांविरोधात दादर पोलिसठाण्यात तक्रार दिली.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडसाळपणा केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल चिन्ह लावा असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. यापूर्वीपण शाखांवरुन दोन्ही बाजूचे पदाधिकारी परस्परांशी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.

पुण्याच्या सभेत ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पण तिखट प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह गेले तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content