Homeपब्लिक फिगरआता झाला ना...

आता झाला ना माजी… त्याच्या चुका तो निस्तारेल!!

किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती आपण मागवली आहे. त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? काहींचा तर ३०-३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. हा पैसा तुमचा नाही… सरकारकडे कररुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे. त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना?… काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण… कोण त्याला काय करतंय… तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता, असा सवालही त्यांनी केला.

जनता दरबार उपक्रमाच्या निमित्ताने आले असता पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जनतेचा आजही पोलिसांवर विश्वास आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांना जनतेने सहकार्य केले होते. आता चार महिन्यांत राज्यात चाललेली परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई, दि. १५ (विशेष प्रतिनिधी)- तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे प्रस्थ वाढले आहे. काही मंत्र्यांच्या बोलण्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात… पाहात असतात… लक्षात ठेवत असतात… काहीजण सहज बोललो असे नंतर म्हणत आहेत… पण, सहज बोलायला तुम्ही सामान्य नागरीक नाहीत… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर जबाबदारी आहे, अशा शब्दांत राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील वाचाळवीरांना आज खडसावले.

मध्यंतरी अब्दुल सत्तार माझी बहिण सुप्रिया, हिला काही बोलले… विनाशकाले विपरीत बुद्धी… हेच त्यांना बोलले पाहिजे… आपण काय बोलतोय… मंत्री केले म्हणजे वेगळे झाले का… मंत्रीपदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी… असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान… कायदा… नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो, असेही ते म्हणाले.

अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली… बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडते… सरकार काय करत आहे?… ठाण्यात किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. अशी राडेबाजी करुन चालणार नाही… पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालले आहे, असा सवालही पवार यांनी केला. आनंदाचा शिधा आता जनतेसाठी ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. अजून महाराष्ट्रातील लोकांना शिधा मिळालेला नाही. एका बहाद्दर मंत्र्यांने तर सांगितले की, तुलसीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते, तोपर्यंत देऊ… अजूनपर्यंत दिलेला नाही. ओल्या दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content