Homeमुंबई स्पेशलवर्सोव्यात मच्छिमारांसाठी लवकरच...

वर्सोव्यात मच्छिमारांसाठी लवकरच अद्ययावत जेट्टी

मुंबईतल्या वर्सोवा येथे सागरी किनारी मच्छिमारांसाठी अद्ययावत, सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 336 कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे प्रेझेंटेशन या परिसरातल्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची राज्याचे मत्स्योद्योग विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत दाखवण्यात आले.

वर्सोव्यात अद्ययावत जेट्टी उभारण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली होती. मुंबईच्या वर्सोवा खाडीत साचलेल्या गाळामुळे येथील मच्छिमार बांधवांच्या बोटी रुतून बसतात. अनेकदा अपघात होतात. त्यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या संदर्भात डॉ. लव्हेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार कोटी एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे 1,28,586 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा गाळ नियमित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी वर्सोवा साचलेला गाळ काढण्याविषयी लक्षवेधी सूचना लावली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकरीता विशेष बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वर्सोव्यातील साचलेल्या गाळासंदर्भात त्यांनी नुकतीच बैठक लावली. या बैठकीला आमदार लव्हेकर व मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी या मागणीची दखल घेत गाळ काढण्यासंदर्भात आवश्यक निधी मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content