Homeचिट चॅटपर्यटक वाहनचालकांसाठी नवीन...

पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही पर्यटक वाहनचालक ऑनलाईन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण / परवाना”साठी अर्ज करू शकतो. अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि शुल्क जमा झाल्यानंतर परवाना जारी केला जाईल.

पर्यटक वाहनचालकांसाठी १ एप्रिलपासून नियम लागू

”अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकृत आणि परवाना नियम 2021” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवीन नियमांचा सामान्य वैधानिक आदेश 166(इ) 10 मार्च 2021 रोजी प्रकाशित झाला आहे. नवीन नियम १ एप्रिल २०२१पासून लागू होतील. सर्व विद्यमान परवाने त्यांच्या वैधतेपर्यंत लागू राहतील.

पर्यटनाला मिळणार दूरगामी चालना

या नवीन नियमांमुळे आपल्या देशातील विविध राज्यांमधील पर्यटनाला दूरगामी चालना मिळणे अपेक्षित आहे. यासह राज्य सरकारांच्या महसुलातही वाढ होईल. परिवहन विकास परिषदेच्या 39व्या आणि 40व्या बैठकीत उचलण्यात आलेल्या या पावलांवर चर्चा झाली आणि आणि या परिषदेत सहभागी राज्यातील प्रतिनिधींकडून याबाबत प्रशंसा करण्यात आली आणि सहमती झाली. मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय परवाना पद्धतीअंतर्गत यशस्वीरीत्या आणल्यानंतर मंत्रालयाने, पर्यटक प्रवासी वाहनांची वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे नवीन नियम जारी केले आहेत.

तीन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत

याशिवाय, तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा एका वेळी तीन वर्षांपर्यंतच्या  कालावधीसाठी, प्राधिकृत / परवान्याच्या स्वरूपात ही योजना परिवर्तनाची अनुमती देते. आपल्या देशात पर्यटनाचा हंगाम मर्यादित आहे आणि त्यादृष्टीने ज्या वाहनचालकांकडे मर्यादित आर्थिक क्षमता आहे अशा बाबींना लक्षात घेऊन ही तरतूद समाविष्ट केली गेली आहे. यामुळे प्राधिकृत / परवाना संदर्भातील केंद्रीय संकलित माहिती आणि शुल्क एकत्रित करून पर्यटकांची ये-जा, सुधारणेला वाव आणि पर्यटनाला चालना देण्याची संधी मिळेल.

गेल्या पंधरा वर्षांत आपल्या देशात  प्रवास आणि पर्यटन उद्योग अनेक पटीने वाढला असून त्यादृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत. या वाढीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे योगदान आहे आणि ग्राहकांच्या अनुभवाचा कल आहे.

Continue reading

जातीसह जनगणनेची अधिसूचना येत्या 16 जूनला!

भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य केला जाईल. लडाख तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील...

अंतराळवीर शुक्ला करणार एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यास

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’चे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे अस्तित्व तपासणार आहे. शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक...

भारताच्या स्वच्छ हवा मोहिमेला ‘पेटीएम’चा हातभार

पेटीएमने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसोबतच्या (यूएनईपी) सहयोगात आणि पेटीएम फाउंडेशनच्या पाठिंब्याने एअर क्वॉलिटी अ‍ॅक्शन फोरमच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश सहयोग प्रोत्साहन, जागरुकता निर्माण करणे आणि स्केलेबल, तंत्रज्ञानआधारित उपाय सुलभ करणे असा आहे, जेणेकरून भारताच्या...
Skip to content