Homeचिट चॅटयुवा अॅथलेटिक्स स्पर्धेत...

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४८०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्स, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, टीजेएसबी बँक हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात संपन्न झाली. ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळांच्या खेळाडूंनीदेखील या स्पर्धेत चमक दाखवली.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून चैतन्य साळवे आणि अर्णव साबळे यांची निवड झाली, तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अॅना एन आणि आरोही नलावडे यांनी हा मान मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम शेट्टी, ध्रुव शिरोडकर आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिहिका सुर्वे आणि रिद्धी माने यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात समर्थ भिंगारदेवे, आयुष पाटील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या बांगर यांनी सर्वोत्तम धावपटूंचा मान मिळवला. गोळाफेकमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात राज प्रजापती, १७ वर्षांंखालील मुलांच्या गटात खुशाल तिवारी आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात स्टॅनिस क्वाड्रोस यांनी सुवर्णपदके जिंकली. १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत ऋतुजा वारदेकर आणि १७ वर्षांखालील गटात नव्या चकूरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content