Homeपब्लिक फिगरशरद पवारांच्या घोषणेला...

शरद पवारांच्या घोषणेला राष्ट्रवादीकडूनच सुरूंग!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल. काँग्रेस जर यासाठी तयार नसेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीरपणे केलेली घोषणा महिन्या- दोन महिन्यांतच निकालात निघाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी केलेल्या संबोधनात शरद पवार यांनी ही घोषणा केली होती. जूनमध्ये झालेल्या या घोषणेला ऑगस्टमध्येच सुरूंग लावण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक याबाबतचा निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्षांविरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतले पक्ष परस्परांशी लढत देतील हे स्पष्ट झाले आहे.

शरद

काही ठिकाणी भाजपाचे अस्तित्त्व नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षांची, तीन पक्षांची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले.

दानवेंचे मंत्रीपद फक्त बोलण्यासाठी..

मोदीसाहेबांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत.. राज्यमंत्र्यांना किती अधिकार.. व कितीजण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही, ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत.. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही असा टोला त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

१५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आला नाही अशी टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर बोलताना मलिक म्हणाले की, रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे.

हेही वाचा २८ डिसेंबरला सोनिया व राहुल गांधी शिवाजी पार्कवर!

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content