Homeडेली पल्सयंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात...

यंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात एनसीसीच्या मुली विक्रमी संख्येत

राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू असलेल्या शिबिरात यंदा सहभागी होणाऱ्या 2,361 कॅडेट्सपैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग वाढला आहे. इतकेच नव्हे तर युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले 135 छात्रही यात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिरात 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्ट. जनरल गुरबीरपाल सिंग यांनी काल दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले सुमारे 135 छात्र शिबिरात भाग घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात एनसीसी कॅडेट्सची संख्याही 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली असून त्यात 40% मुली आहेत, असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी नमूद केले.

या शिबिरात सहभागी होणारे छात्र अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणविषयक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे तसेच छात्रांच्या वैयक्तिक गुणांना अधिक वाव देऊन त्यांची मूल्यप्रणाली बळकट करणे हा या शिबिराचा हेतू आहे. उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासह अनेक मान्यवर या शिबिराला भेट देणार आहेत. 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात एनसीसीची ही तुकडीदेखील सहभागी होईल. दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला पंतप्रधानांच्या रॅलीने या उपक्रमांचा समारोप होईल, असेही सिंग यांनी नमूद केले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content