Homeपब्लिक फिगरमहमद युनूस बांगलादेशचे...

महमद युनूस बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते महमद युनूस यांची हंगामी पंतप्रधान म्हणून सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा घेतला गेला. युनूस यांनी ग्रामीण बँकद्वारे वंचित घटकांसाठी सूक्ष्म वित्तपुरवठा प्रणाली विकसित केली. त्यामुळे त्यांना २००६मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.

संसद विसर्जित करून नव्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राष्ट्रपती शहाबुद्दीन आणि विद्यार्थी संघटनांच्या समन्वयकांमध्ये बैठक झाली. त्यात युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचे नेतृत्त्व सोपवण्याचे ठरले. बांगलादेशातील सध्याच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी संघटनांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ संघटनेच्या नेत्यांनी युनूस यांचे नाव हंगामी प्रमुख म्हणून सुचवले होते. त्याला त्यांनी सहमती दर्शवली होती.

या निर्णयामुळे देशातील तणाव कमी होण्याची शक्यता असली तरी अनेक आव्हाने कायम आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली आहे. झिया, यांचे वय ७९ वर्षे आहे. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. याशिवाय, १ जुलैनंतर अटक करण्यात आलेल्यांचीही मुक्तता सुरू आहे. त्यामुळे तेथील राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, जोशोर जिल्ह्यात हिंसाचाराची एक गंभीर घटना घडली आहे. एका तारांकित हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह २४ लोकांना संतप्त जमावाने जिवंत जाळले. हे हॉटेल अवामी लीगचे सरचिटणीस शाहीन चक्कलदार यांच्या मालकीचे होते. हिंसाचारामुळे मृतांची एकूण संख्या ४००वर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील शांतता प्रस्थापित करणे हंगामी सरकारसाठी एक मोठे आव्हान असेल, अशी चर्चा आहे.

Continue reading

कोरियाच्या जेवॉन किमनी जिंकली ‘इफ्फी’तल्या लोकांची मने!

गोव्यात काल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरूवात एका बंदिस्त सभागारात न होता चक्क रस्त्यांवर झाली. रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पाहा, अशा जिवंत, उत्साहपूर्ण वातावरणात या महोत्सवाला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात प्रथमच, 'इफ्फी'ने पारंपरिक चार भिंती...

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास...
Skip to content