Homeमुंबई स्पेशलविदेशात जाणाऱ्यांसाठी सोमवार...

विदेशात जाणाऱ्यांसाठी सोमवार ते शनिवार लसीकरण!

शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी विदेशी जाणाऱ्या व्यक्तींना आता आठवड्यातील सोमवार ते शनिवार अशा सहापैकी कोणत्‍याही दिवशी, महानगरपालिकेने नेमून दिलेल्‍या ७ समर्पित कोविड लसीकरण केंद्रावर लस घेता येईल.

मुंबई महापालिकेने ही घोषणा केली आहे. यापूर्वी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस ही मुभा होती. त्‍यामध्‍ये गुरुवार ते शनिवार अशी तीन दिवसांची सवलत वाढविण्‍यात आली आहे. ही सवलत दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२१पर्यंत लागू राहणार आहे.

मुंबई महापालिकेकडून मुंबईत करी रोड येथील कस्‍तुरबा, परळ येथील केईएम, अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स, विलेपार्ले येथील डॉ. कूपर, गोवंडी येथील महानगरपालिका शताब्‍दी,  घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालय आणि दहिसर जम्‍बो कोविड सेंटर, या सात ठिकाणी विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिक खेळाडू यांच्‍यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

शैक्षणिक कारणासाठी, नोकरीसाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांनी किंवा टोकियो (जपान)मध्‍ये नियोजित ऑलिम्पिक क्रीडा स्‍पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्‍या लसीकरणामध्‍ये केंद्र सरकारच्‍या विविध निर्देशानुसार सुलभता आणली जात आहे. अशा नागरिकांनी कोविशिल्‍ड लसीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर ८४ दिवस पूर्ण होण्‍यापूर्वीच, त्‍यांना विदेशात जाणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास, पहिला डोस घेतल्‍यानंतर किमान २८ दिवसांचे अंतर पूर्ण झाले असल्‍यास दुसरा डोस मिळू शकतो.

संबंधित नागरिकाच्‍या लसीकरण प्रमाणपत्रावर आता त्‍यांचा पारपत्र (पासपोर्ट)चा क्रमांकदेखील नोंदवला जातो. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविशिल्‍ड ही लस आपत्‍कालीन वापरासाठी मान्‍य केल्‍याने लस प्रमाणपत्रावर कोविशिल्‍ड या लसीचा उल्‍लेख आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content