Homeबॅक पेजघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये एमआयजी आणि डॅशिंग अंतिम फेरीत

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना हे यश मिळवून देण्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्रीची आक्रमक फलंदाजी कारणीभूत ठरली. तिने ५९ चेंडूत १० चौकार मारत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळे तिच्या संघाला साईनाथची ४ बाद १२६ ही तशी माफक धावसंख्या १९ षटकांमध्ये पार करता आली. त्यांची गाठ आता डॅशिंग स्पोर्ट्सशी उद्या बुधवारी माटुंगा जिमखान्यावर होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये नॅशनल क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करून डॅशिंग स्पोर्ट्सने एमआयजीशी लढण्यासाठी आपली सिद्धता केली. नॅशनलला २० षटकांत केवळ ९ बाद ८६ अशी मजल मारता आली. त्यांची ध्रुवी त्रिवेदी ही १८ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. निलाक्षी तलाठी आणि श्रेया सुरेश यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. डॅशिंगने १५ षटकांमध्ये आपले लक्ष्य पार केले. २ बाद १८ नंतर खुशी निजाई (नाबाद २७) आणि किमया राणेने (नाबाद ३२) ६९ धावांची अभेद्य भागिदारी केली.

आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये साईनाथने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो तसा चुकीचा ठरला. सलामीची अंशू पाल आणि या स्पर्धेत एका शतकासह दोन अर्धशतके फटकावणारी किंजल कुमारी केवळ ४ धावांवर बाद झाल्याने त्यांची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्यानंतर शेजल विश्वकर्मा (५७ चेंडूत ५७ आणि वेदिका पाटील ५३ चेंडूत ५२) यांनी ११५ धावांची भागीदारी केली खरी, पण त्यामुळे एमआयजीसमोर फार मोठे लक्ष्य साईनाथला ठेवता आले नाही. महेक मिस्त्रीने आपल्या ऑफ स्पिनवर ४ षटके टाकत स्वत:ची उपयुक्ततापण सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

साईनाथ स्पोर्ट्स क्लब-  २० षटकांमध्ये ४ बाद १२६ (सेजल विश्वकर्मा ५७, वेदिका राजेश पाटील ५२)

पराभूत वि.

एमआयजी क्रिकेट क्लब- १९ षटकात ४ बाद १२७ (महेक मिस्त्री नाबाद ७४)

सर्वोत्तम खेळाडू- महेक मिस्त्री

नॅशनल क्रिकेट क्लब- २० षटकांमध्ये ९ बाद ८६ (ध्रुवी त्रिवेदी १८, पूर्ती नाईक २८/२, निलाक्षी तलाठी १०/२, श्रेया सुरेश ८/२, तिशा नाईक २५/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १५ षटकांत २ बाद ८७ (किमया राणे ३२ नाबाद, खुशी निजाई २७ नाबाद, तनिषा शर्मा १०/२)

सर्वोत्तम खेळाडू- निलाक्षी तलाठी

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content