Homeबॅक पेजघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये एमआयजी आणि डॅशिंग अंतिम फेरीत

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना हे यश मिळवून देण्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्रीची आक्रमक फलंदाजी कारणीभूत ठरली. तिने ५९ चेंडूत १० चौकार मारत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळे तिच्या संघाला साईनाथची ४ बाद १२६ ही तशी माफक धावसंख्या १९ षटकांमध्ये पार करता आली. त्यांची गाठ आता डॅशिंग स्पोर्ट्सशी उद्या बुधवारी माटुंगा जिमखान्यावर होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये नॅशनल क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करून डॅशिंग स्पोर्ट्सने एमआयजीशी लढण्यासाठी आपली सिद्धता केली. नॅशनलला २० षटकांत केवळ ९ बाद ८६ अशी मजल मारता आली. त्यांची ध्रुवी त्रिवेदी ही १८ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. निलाक्षी तलाठी आणि श्रेया सुरेश यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. डॅशिंगने १५ षटकांमध्ये आपले लक्ष्य पार केले. २ बाद १८ नंतर खुशी निजाई (नाबाद २७) आणि किमया राणेने (नाबाद ३२) ६९ धावांची अभेद्य भागिदारी केली.

आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये साईनाथने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो तसा चुकीचा ठरला. सलामीची अंशू पाल आणि या स्पर्धेत एका शतकासह दोन अर्धशतके फटकावणारी किंजल कुमारी केवळ ४ धावांवर बाद झाल्याने त्यांची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्यानंतर शेजल विश्वकर्मा (५७ चेंडूत ५७ आणि वेदिका पाटील ५३ चेंडूत ५२) यांनी ११५ धावांची भागीदारी केली खरी, पण त्यामुळे एमआयजीसमोर फार मोठे लक्ष्य साईनाथला ठेवता आले नाही. महेक मिस्त्रीने आपल्या ऑफ स्पिनवर ४ षटके टाकत स्वत:ची उपयुक्ततापण सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

साईनाथ स्पोर्ट्स क्लब-  २० षटकांमध्ये ४ बाद १२६ (सेजल विश्वकर्मा ५७, वेदिका राजेश पाटील ५२)

पराभूत वि.

एमआयजी क्रिकेट क्लब- १९ षटकात ४ बाद १२७ (महेक मिस्त्री नाबाद ७४)

सर्वोत्तम खेळाडू- महेक मिस्त्री

नॅशनल क्रिकेट क्लब- २० षटकांमध्ये ९ बाद ८६ (ध्रुवी त्रिवेदी १८, पूर्ती नाईक २८/२, निलाक्षी तलाठी १०/२, श्रेया सुरेश ८/२, तिशा नाईक २५/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १५ षटकांत २ बाद ८७ (किमया राणे ३२ नाबाद, खुशी निजाई २७ नाबाद, तनिषा शर्मा १०/२)

सर्वोत्तम खेळाडू- निलाक्षी तलाठी

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content