Saturday, May 18, 2024
Homeकल्चर +‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात...

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर..

चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी स्थापन केलेल्या कडक एंटरटेनमेंटने तीन महान प्रॉपर्टी तयार केल्या असून त्याद्वारे मराठी प्रेक्षकांसाठी विविध विषय आणि शैलींचा कंटेंट प्रदान केला जातो.

या अनोख्या जोडीच्या नव्या कामगिरीचा लाभ चिंगारीवर घेता येईल तसेच या भागीदारीतून प्रादेशिक कन्टेन्ट लायब्ररीही अधिक समृद्ध केली जाईल. हे शॉर्ट व्हिडिओ अॅप प्रादेशिक अस्तित्त्व अधिक बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कडक एंटरटेनमेंटसोबतची ही भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले की, रुढी-प्रथा मोडत, आमच्या यूझर्ससाठी सर्वोच्च क्षमतेने उत्कृष्ट मनोरंजन पुरवणे, ही चिंगारीची ब्रँड फिलॉसॉफी आहे. कडक एंटरटेनमेंटची तत्त्वेही अशीच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही स्वाभाविकरित्या जोडले जाऊ शकतो. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.

कडक एंटरटेनमेंटच्या श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्निल मुनोत म्हणाल्या की, ही भागीदारी करताना, विशेषत: विनोदी कन्टेन्टसाठी आम्ही खूप उत्साही आहोत. कडक मराठीकडे कन्टेन्ट निर्मितीसाठी अनेक योजना असल्याने चिंगारीच्या यूझर्सचे आणखी मनोरंजन होईल, याची आम्ही खात्री देतो. चिंगारी अॅपसोबत अनेक उपक्रमही आम्ही राबवणार आहोत. जास्तीतजास्त लोकांपर्यंत जास्तीतजास्त मनोरंजनाकरिता कडक मराठीचा ताजा कन्टेन्ट चिंगारी अॅपच्या विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी दीर्घकालीन संबंधांची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे.

Continue reading

फडणवीसांचा झंझावात! 52 दिवसांत तब्बल 115 सभा!!

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत तब्बल 115 सभांचा धडाका लावला तर याच काळात त्यांनी माध्यमांना 67 मुलाखती दिल्या. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि आज 18 मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा...

या निवडणुकीत तुतारी वाजलीच नाही!

पराजय समोर दिसत असल्याने, तुतारी वाजलीच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त, निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत...

उबाठाला आता भगव्या झेंड्याचीही अ‍ॅलर्जी!

बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदूत्व सोडले. आता तर उबाठाला शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याचीही अ‍ॅलर्जी झालीय. आता तर त्यांच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
error: Content is protected !!