Homeब्लॅक अँड व्हाईटभारत व मंगोलियातले...

भारत व मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध होणार आणखी सुदृढ

भारत आणि मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध अधिक सुदृढ करण्याच्या उद्येश्याने या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची दोन दिवसांची 12वी बैठक काल मंगोलियाची राजधानी उलानबातर इथे समाप्त झाली. भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्टेट सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल गानखुयाग दावगदोर्ज या दोघांनी या बैठकीचे सहअध्यक्षस्थान भुषवले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

संयुक्त कार्यकारी गटाच्या या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्रविषयक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनाही निश्चित करून त्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या भूराजकीय परिस्थितीबद्दलच्या परस्परांची मते जाणून घेतली.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राची क्षमता यावेळी अधोरेखित केली. मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबतची भागिदारी  फलदायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगोलियानेही भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राच्या क्षमतेप्रती विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या या प्रमुख प्रतिनिधींनी परस्परांमध्ये दृढ होत असलेल्या संबंधांची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे  सहसचिव अमिताभ प्रसाद आणि भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे यांनी मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी. बयारमगनई यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाने उलानबातर इथल्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेतला.

मंगोलियासोबत भारताचे जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना परस्परांचे ‘आध्यात्मिक शेजारी’ मानतात. सध्याच्या आधुनिक काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि बाजारआधारित अर्थव्यवस्था यांसारख्या मूल्यांनी दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणले आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content