Homeकल्चर +संदीप खरेंच्या आवाजात...

संदीप खरेंच्या आवाजात ऐका ‘मी.. कालिदास’!

आषाढस्य प्रथम दिवसे.. म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे कारण कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. हा दिवस रविवारी ११ जुलै रोजी येत आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ने यानिमित्ताने ‘मी.. कालिदास’ ही डॉ. मंगला मिरासदार लिखित चरित्रात्मक कादंबरी ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित करत आहे. लोकप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या गोड आवाजात ‘मी.. कालिदास’ ऐकणं ही रसिक श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी आहे.

भारतभूमीच्या इतिहासात रसिकांच्या हृदयावर विराजमान झालेले एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे कालिदास. काव्य, नाट्य, शृंगार आदी नऊ रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती निर्माण करणारा कालिदास हा सदैव सर्व रसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्याचे जीवन समजून घेणे सोपे नसले तरी मंगला मिरासदार यांनी लिहिलेल्या ‘मी.. कालिदास’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथामधून कालिदासाच्या जीवनप्रवासाची ओळख करुन घेण्याची संधी या ऑडिओबुकमध्ये रसिक श्रोत्यांना लाभली आहे.

कालिदासाबद्दल सांगितल्या जाणार्‍या आख्यायिकांमधून, कालिमातेने प्रसन्न होऊन त्याला प्रतिभेच्या दिव्य गुणाचे वरदान दिले, असे म्हटले जात असले तरी लेखिकेने कालिदासाच्या वेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे. कालिदासाने अवगत केलेल्या काव्य व शास्त्र या कला आणि त्यातील निपुणता त्याने किती कष्टाने साध्य केली हे वाचकांसमोर आणले आहे.

कालिदास हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. कालिदास कधी होऊन गेला हे केवळ त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतीच्या अभ्यासाने अंदाज बांधून ठरवावे लागते. असे असले तरी कालिदासाच्या काव्य – नाट्य – कलाकृती आजही मनाला भुरळ घालतात, अभ्यासल्या जातात. कालिदासाचा मेघदूत तरुण-तरुणींना आजही स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासणे सोपे नाही. मंगला मिरासदार यांनी आपल्या लेखनशैलीने सर्वांना समजणाऱ्या कादंबरीच्या परिभाषेत तो प्रस्तुत केला आहे.

‘मी.. कालिदास’ या अत्यंत वेगळ्या आणि वैशिट्यपूर्ण कादंबरीच्या लेखिका डॉ. मंगला मिरासदार पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत विषयाच्या प्राध्यापक होत्या. कौटिल्य अर्थशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी ‘मी.. कालिदास’सोबतच ‘श्री सत्यसाई’, ‘घोषवती’, ‘राजमुद्रा अर्थात मुद्राक्षसम’, ‘कथा सुभाषितांच्या’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र – एक अध्ययन’ तसेच इंग्रजीतील ‘द पॉलिटिकल आयडीयाज इन द पंचमहाकाव्यज’ अशा  विविध विषयांवरील ग्रंथनिर्मिती केली आहे. ११ जुलैला कालिदास दिवसाचे औचित्य साधून कालिदासांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते या चरित्ररूपी कादंबरीचे निश्चितच स्वागत करतील. ‘मी.. कालिदास’ ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content