Homeमुंबई स्पेशलप्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28...

प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28 हजार रिक्षा-टॅक्सीचालकांचे परवाने होणार रद्द!

प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे नाकारणे- 28814, विनागणवेश वाहन चालविणे- 1164, ज्यादा प्रवासी घेऊन वाहन चालविणे- 6268 आणि 12171 इतर गुन्ह्यांचा समावेश होता. यातील प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28814 चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहआयुक्त (वाहतूक) यांनी स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात 29 एप्रिलला मुंबई आणि उपनगरात राबविलेल्या मोहीमेत दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या 13 चालकांविरुद्ध कारवाई सुरु असून त्यांचे चालन परवाने रद्द करण्यात येत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- तब्रेज नानकाऊ (31), गोवंडी, रवि गोठाला (40) प्रभादेवी, गोविंद राठोड (35) 17 सी वरळी पोलिस कॉलनी, वृशाली मिस्त्री (26), माहीम पश्चिम, राहुल जयस्वाल (32) सायन कोळिवाडा, हसिब खान (32) वडाळा पूर्व, सुनिल विश्वकर्मा (29) धारावी, फिरोज रुस्तम (20) विक्रोळी पूर्व, हुसेन नियाजी (25), मिरा रोड पूर्व, सुनिल शर्मा ( 32) सांताक्रूज पश्चिम, मोहम्मद शेख (27), मालाड पश्चिम, स्वरुप मेहता ( 32), खेतवाडी, गिरगाव आणि मनोज विश्वकर्मा (30) दहीसर पूर्व. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 123अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण

दरम्यान, वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या काही भागात पुढीलप्रमाणे नियमन केले आहे.

माहीम– रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर शांतीदुर्गा सोसायटी ते मुच्यअल कॉलनी या पट्ट्यात समदिनी (2,4,6 तारखा) दक्षिण वाहिनीवर वाहने उभी करण्यात यावीत आणि विषमदिनी (1,3,5) रस्त्याच्या उत्तर वाहिनीवर वाहने उभी करण्यात यावीत, असा आदेश पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी जारी केला आहे. हे बदल 05 ऑक्टोबरपर्यंत लागू असतील. याचप्रमाणे घाटकोपर पश्चिमेस धर्मवीर संभाजी मार्गावर चिराग नगरजवळ गोल्डन बेकरी ते मच्छी मार्केट या पट्टयात सकाळी 11 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश नसेल. हे बदल उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 05 ऑगस्टपर्यत लागू राहतील. शिवाय कुर्ला (पश्चिम) संत रोहिदास मार्गावर सिताराम भैरु मार्ग ते इगलवाडी लेन या पट्ट्यात 06 ऑक्टोबरपर्यंत जड वाहनांना प्रवेश नसेल. या काळात इतर वाहनांनी समदिनी (2,4,6) रस्त्याच्या पूर्व वाहिनीवर गाड्या पार्क कराव्यात आणि विषमदिनी (1,3,5) रस्त्याच्या पश्चिम वाहिनीवर गाड्या पार्क कराव्यात, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Continue reading

जगाला गवसणी घालून भारतात परतल्या नौदलाच्या नाविका!

आठ महिन्यांत 'आय.एन.एस.व्ही तारीणी' या विषेश नौकानयन जहाजावरील 25000हून अधिक नॉटिकल मैलाच्या प्रवासात, तीन महासागरे, चार मोठी बेटे आणि तीन समुद्रीतळांना भेट देऊन भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी गुरुवारी भारतात परतल्या. गोव्यातील भारतीय नौदलाच्या मोले जेट्टी, मार्मुगाव पोर्ट इथे आयोजित कार्यक्रमात, संरक्षणमंत्री...

पावसाळ्यात पाणी तुंबणे ही तर मुंबईची एक परंपरा!

सतत मुसळधार पावसात मुंबईत पाणी तुंबणे ही गेले कित्येक दशकांची परंपरा आहे आणि मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने मेघालयातील चेरापुंजीला कधीच मागे टाकले आहे. रस्ते, रेल्वे आणि बरोबरीने हवाई वाहतूक ठप्प होणे अशा प्रकारामुळे भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील “मुंबई की बारीश”ची एक...

‘ऑपरेशन सिंदूर’वरही निघाले पुस्तक!

एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी हल्ला असो की काश्मीरमधला दहशतवाद. त्यावर आधारीत कथा, पुढे पटकथा आणि नंतर चित्रपट अशी मालिका...
Skip to content