Tuesday, February 4, 2025
Homeपब्लिक फिगरतिकिटे न मिळाल्याने...

तिकिटे न मिळाल्याने चाकरमान्यांचा संताप!

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकीट आरक्षणात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनांच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी या पत्राद्वारे केली आहे.

1 COMMENT

  1. हे तर दरवर्षीचेच रडगाणे आहे. राजकारणी , रेल्वेमंत्री म्हटले तर त्यांच्या हातातील गोष्ट आहे. पण आपण लोकांसाठीच आहोत, लोकांसाठीच काम करतो हे प्रत्येक राजकारणी मग तो स्थानिक असो किंवा दिल्लीश्वर असो, अगदी मोठमोठ्या सभा घेवून किंवा माध्यमाद्वारे सांगत असतो ते गेले कुठे? ह्यासाठी कोणी आ आंदोलन करेल का?

Comments are closed.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content