Homeपब्लिक फिगरतिकिटे न मिळाल्याने...

तिकिटे न मिळाल्याने चाकरमान्यांचा संताप!

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकीट आरक्षणात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनांच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी या पत्राद्वारे केली आहे.

1 COMMENT

  1. हे तर दरवर्षीचेच रडगाणे आहे. राजकारणी , रेल्वेमंत्री म्हटले तर त्यांच्या हातातील गोष्ट आहे. पण आपण लोकांसाठीच आहोत, लोकांसाठीच काम करतो हे प्रत्येक राजकारणी मग तो स्थानिक असो किंवा दिल्लीश्वर असो, अगदी मोठमोठ्या सभा घेवून किंवा माध्यमाद्वारे सांगत असतो ते गेले कुठे? ह्यासाठी कोणी आ आंदोलन करेल का?

Comments are closed.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content