Homeपब्लिक फिगरकोविडसाठी ५० टक्के...

कोविडसाठी ५० टक्के खाटा आरक्षित करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहरातली कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील खासगी इस्पितळात ५० टक्के बेड आरक्षित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक यात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या आलेखातून निदर्शनास येत आहे. मार्चनंतर आजतागायत संख्या कमी करण्यासाठी आपल्या नियोजनाला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. आज एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाखत देताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कोव्हिडच्या रुग्णांना घेऊन गेल्यानंतर जनरल बेड उपलब्ध नसतात. आयसीयूमध्ये कोव्हिडव्यतिरिक्त इतर रुग्णांना प्रवेश दिले जातात.   परिणामी रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होताना दिसत आहे. लसीकरण सध्या सुरू असले तरी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील नियमात शिथिलता आल्याने रुग्णांत सध्या वाढ होताना दिसत आहे. तरी पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व इस्पितळात जनरल वॉर्डात आणि आयसीयूमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content