Homeपब्लिक फिगरकोविडसाठी ५० टक्के...

कोविडसाठी ५० टक्के खाटा आरक्षित करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहरातली कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील खासगी इस्पितळात ५० टक्के बेड आरक्षित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक यात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या आलेखातून निदर्शनास येत आहे. मार्चनंतर आजतागायत संख्या कमी करण्यासाठी आपल्या नियोजनाला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. आज एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाखत देताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कोव्हिडच्या रुग्णांना घेऊन गेल्यानंतर जनरल बेड उपलब्ध नसतात. आयसीयूमध्ये कोव्हिडव्यतिरिक्त इतर रुग्णांना प्रवेश दिले जातात.   परिणामी रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होताना दिसत आहे. लसीकरण सध्या सुरू असले तरी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील नियमात शिथिलता आल्याने रुग्णांत सध्या वाढ होताना दिसत आहे. तरी पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व इस्पितळात जनरल वॉर्डात आणि आयसीयूमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content