Tuesday, February 4, 2025
Homeपब्लिक फिगरकोविडसाठी ५० टक्के...

कोविडसाठी ५० टक्के खाटा आरक्षित करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहरातली कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील खासगी इस्पितळात ५० टक्के बेड आरक्षित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक यात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या आलेखातून निदर्शनास येत आहे. मार्चनंतर आजतागायत संख्या कमी करण्यासाठी आपल्या नियोजनाला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. आज एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाखत देताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कोव्हिडच्या रुग्णांना घेऊन गेल्यानंतर जनरल बेड उपलब्ध नसतात. आयसीयूमध्ये कोव्हिडव्यतिरिक्त इतर रुग्णांना प्रवेश दिले जातात.   परिणामी रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होताना दिसत आहे. लसीकरण सध्या सुरू असले तरी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील नियमात शिथिलता आल्याने रुग्णांत सध्या वाढ होताना दिसत आहे. तरी पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व इस्पितळात जनरल वॉर्डात आणि आयसीयूमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content