Homeचिट चॅटके. पी. जाधव...

के. पी. जाधव यांचे निधन

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. म्हाडाच्या ओनरशिप वसाहतीतील अत्यंत जुन्या अशा सिद्ध गृहनिर्माण सहकारी संस्थेचे जाधव गेल्या ४० वर्षांपासून मानद सचिव होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ नगर महापालिका शाळेच्या सभागारात जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान व पुण्यानुमोदन (शोकसभा) कार्यक्रम होणार आहेत.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेले मळण हे त्यांचे जन्मगाव. रिझर्व्ह बँकेत क्लार्कपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदाची सांभाळून जाधव मार्च २००३मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र नोकरीत असल्यापासूनच ते या परिसरातल्या विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. सदैव हसतमुख आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे जाधव यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थेबद्दल विशेष अभ्यास होता. सिद्ध सहकारी संस्थेचा ते चालताबोलता इतिहास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या कामात स्वतःाला झोकून दिले होते.

साधारण १६ वर्षांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. मात्र, त्यानंतरही ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. साधारण आठवड्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना गोरेगावातल्याच एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनाही ते उत्तम प्रतिसाद देत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. परंतु शुक्रवारी संध्याकाळी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानिमित्त मळण गावातल्या सामाजिक संस्था तसेच गुहागरमधल्या बौद्धजन सहकारी संस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ नगर मनपा साळा संकुल (मुंबई पब्लिक स्कूल, सिद्धार्थ नगर रोड नं. १, प्रबोधन मैदानाजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४) येथे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान तसेच इतर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content