Homeचिट चॅटके. पी. जाधव...

के. पी. जाधव यांचे निधन

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. म्हाडाच्या ओनरशिप वसाहतीतील अत्यंत जुन्या अशा सिद्ध गृहनिर्माण सहकारी संस्थेचे जाधव गेल्या ४० वर्षांपासून मानद सचिव होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ नगर महापालिका शाळेच्या सभागारात जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान व पुण्यानुमोदन (शोकसभा) कार्यक्रम होणार आहेत.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेले मळण हे त्यांचे जन्मगाव. रिझर्व्ह बँकेत क्लार्कपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदाची सांभाळून जाधव मार्च २००३मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र नोकरीत असल्यापासूनच ते या परिसरातल्या विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. सदैव हसतमुख आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे जाधव यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थेबद्दल विशेष अभ्यास होता. सिद्ध सहकारी संस्थेचा ते चालताबोलता इतिहास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या कामात स्वतःाला झोकून दिले होते.

साधारण १६ वर्षांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. मात्र, त्यानंतरही ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. साधारण आठवड्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना गोरेगावातल्याच एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनाही ते उत्तम प्रतिसाद देत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. परंतु शुक्रवारी संध्याकाळी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानिमित्त मळण गावातल्या सामाजिक संस्था तसेच गुहागरमधल्या बौद्धजन सहकारी संस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ नगर मनपा साळा संकुल (मुंबई पब्लिक स्कूल, सिद्धार्थ नगर रोड नं. १, प्रबोधन मैदानाजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४) येथे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान तसेच इतर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...

इराण-अमेरिका संघर्षात पुढचे ४८ तास महत्त्वाचे!

पश्चिम आशियातील युद्धज्वाळा आता थेट जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे इराणने भारतासाठी होर्मुझ खुले केले असले तरी दुसरीकडे, अमेरिका आणि इस्त्राईलला कडक इशारा दिला आहे. इराणने येमेनजवळील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. लाल समुद्र आणि...
Skip to content