Homeचिट चॅटके. पी. जाधव...

के. पी. जाधव यांचे निधन

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. म्हाडाच्या ओनरशिप वसाहतीतील अत्यंत जुन्या अशा सिद्ध गृहनिर्माण सहकारी संस्थेचे जाधव गेल्या ४० वर्षांपासून मानद सचिव होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ नगर महापालिका शाळेच्या सभागारात जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान व पुण्यानुमोदन (शोकसभा) कार्यक्रम होणार आहेत.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेले मळण हे त्यांचे जन्मगाव. रिझर्व्ह बँकेत क्लार्कपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदाची सांभाळून जाधव मार्च २००३मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र नोकरीत असल्यापासूनच ते या परिसरातल्या विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. सदैव हसतमुख आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे जाधव यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थेबद्दल विशेष अभ्यास होता. सिद्ध सहकारी संस्थेचा ते चालताबोलता इतिहास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या कामात स्वतःाला झोकून दिले होते.

साधारण १६ वर्षांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. मात्र, त्यानंतरही ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. साधारण आठवड्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना गोरेगावातल्याच एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनाही ते उत्तम प्रतिसाद देत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. परंतु शुक्रवारी संध्याकाळी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानिमित्त मळण गावातल्या सामाजिक संस्था तसेच गुहागरमधल्या बौद्धजन सहकारी संस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ नगर मनपा साळा संकुल (मुंबई पब्लिक स्कूल, सिद्धार्थ नगर रोड नं. १, प्रबोधन मैदानाजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४) येथे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान तसेच इतर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content