Homeचिट चॅटके. पी. जाधव...

के. पी. जाधव यांचे निधन

मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले एक जाणकार व्यक्तिमत्व कृष्णा पांडुरंग तथा के. पी. जाधव यांचे वयाच्या ८१व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. म्हाडाच्या ओनरशिप वसाहतीतील अत्यंत जुन्या अशा सिद्ध गृहनिर्माण सहकारी संस्थेचे जाधव गेल्या ४० वर्षांपासून मानद सचिव होते. येत्या रविवारी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ नगर महापालिका शाळेच्या सभागारात जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान व पुण्यानुमोदन (शोकसभा) कार्यक्रम होणार आहेत.

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेले मळण हे त्यांचे जन्मगाव. रिझर्व्ह बँकेत क्लार्कपासून असिस्टंट मॅनेजरपर्यंतच्या पदाची सांभाळून जाधव मार्च २००३मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र नोकरीत असल्यापासूनच ते या परिसरातल्या विविध सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. सदैव हसतमुख आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे जाधव यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थेबद्दल विशेष अभ्यास होता. सिद्ध सहकारी संस्थेचा ते चालताबोलता इतिहास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या कामात स्वतःाला झोकून दिले होते.

साधारण १६ वर्षांपूर्वी जाधव यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. मात्र, त्यानंतरही ते सामाजिक कार्यात कार्यरत होते. साधारण आठवड्यापूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना गोरेगावातल्याच एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनाही ते उत्तम प्रतिसाद देत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. परंतु शुक्रवारी संध्याकाळी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानिमित्त मळण गावातल्या सामाजिक संस्था तसेच गुहागरमधल्या बौद्धजन सहकारी संस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ नगर मनपा साळा संकुल (मुंबई पब्लिक स्कूल, सिद्धार्थ नगर रोड नं. १, प्रबोधन मैदानाजवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४) येथे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता जाधव यांच्या निधनानिमित्त जलदान तसेच इतर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content